शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

महापौरपदाबरोबरच आता स्थायी समितीसाठीही रस्सीखेच

By admin | Updated: January 8, 2016 01:46 IST

महापौरबदलाच्या हालचाली सध्या थंडावलेल्या असल्या, तरी राष्ट्रवादीअंतर्गत काही नावांमध्ये चुरस सुरूच आहे. त्याचबरोबर आता स्थायी समितीच्या

पुणे : महापौरबदलाच्या हालचाली सध्या थंडावलेल्या असल्या, तरी राष्ट्रवादीअंतर्गत काही नावांमध्ये चुरस सुरूच आहे. त्याचबरोबर आता स्थायी समितीच्या सदस्य व अध्यक्षपदासाठीही रस्सीखेच सुरू झाली आहे. आघाडी धर्म पाळून समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला द्यायचे की तोंडावर आलेली सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन स्वत:कडेच ठेवायचे, याचा निर्णय राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांना घ्यावा लागणार आहे.नियमाप्रमाणे फेब्रुवारीअखेर स्थायी समितीचे आठ सदस्य त्यांची दोन वर्षांची मुदत पूर्ण होत असल्याने निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीचे सभागृह नेते बंडू केमसे, समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे, नंदा लोणकर, शारदा ओरसे, राजश्री आंदेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहुल तुपेरे, अनिल राणे व काँग्रेसचे मुकारी अलगुडे हे सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर त्या-त्या पक्षाचे तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातील. सदस्य निवडीनंतर लगेचच मार्चमध्ये समितीच्या विद्यमान अध्यक्ष अश्विनी कदम यांची अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होत असल्याने त्याही पदासाठी निवडणूक होईल.पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची आघाडी आहे. आघाडीमध्ये झालेल्या पदवाटपानुसार यंदा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये अविनाश बागवे, चंद्रकांत कदम यांच्यात स्पर्धा आहे. बागवे यांनी समितीतील आपली कामगिरी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवत या पदासाठी दावा केला आहे. कदम यांनी आतापर्यंत आपल्याला डावलेले गेले आहे, त्यामुळे आता हे पद द्यावे, अशी मागणी केली असल्याचे समजते. त्याचबरोबर निवृत्त होणारे सदस्य मुकारी अलगुडे यांच्या जागेवर नव्याने नियुक्त होणारे सदस्यही या पदासाठी दावा करू शकतात. मात्र, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नगरसेवकांचे मत काँग्रेसला समितीचे अध्यक्षपद देऊ नये, असे आहे. पालिकेच्या पंचवार्षिकचे हे अखेरचे वर्ष आहे. नवी सार्वत्रिक निवडणूक या वर्षअखेरीस होईल. त्यामुळे स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या आर्थिक समितीचे पद काँग्रेसला देऊन आपल्या पायावर धोंडा टाकून घेऊ नये, असे राष्ट्रवादीच्या प्रमुख नगरसेवकांना वाटते. त्यांनी तसे स्पष्टपणे पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कळवले असल्याचे समजते. पवार यांनीच मागील अध्यक्षपद निवडीच्या वेळी काँग्रेसला हे पद देण्याचा शब्द दिला होता. आता तो शब्द पाळायचा की राजकीय महत्त्व लक्षात घेऊन अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवायचे, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)