शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाबरोबरच आता स्थायी समितीसाठीही रस्सीखेच

By admin | Updated: January 8, 2016 01:46 IST

महापौरबदलाच्या हालचाली सध्या थंडावलेल्या असल्या, तरी राष्ट्रवादीअंतर्गत काही नावांमध्ये चुरस सुरूच आहे. त्याचबरोबर आता स्थायी समितीच्या

पुणे : महापौरबदलाच्या हालचाली सध्या थंडावलेल्या असल्या, तरी राष्ट्रवादीअंतर्गत काही नावांमध्ये चुरस सुरूच आहे. त्याचबरोबर आता स्थायी समितीच्या सदस्य व अध्यक्षपदासाठीही रस्सीखेच सुरू झाली आहे. आघाडी धर्म पाळून समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला द्यायचे की तोंडावर आलेली सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन स्वत:कडेच ठेवायचे, याचा निर्णय राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांना घ्यावा लागणार आहे.नियमाप्रमाणे फेब्रुवारीअखेर स्थायी समितीचे आठ सदस्य त्यांची दोन वर्षांची मुदत पूर्ण होत असल्याने निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीचे सभागृह नेते बंडू केमसे, समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे, नंदा लोणकर, शारदा ओरसे, राजश्री आंदेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहुल तुपेरे, अनिल राणे व काँग्रेसचे मुकारी अलगुडे हे सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर त्या-त्या पक्षाचे तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातील. सदस्य निवडीनंतर लगेचच मार्चमध्ये समितीच्या विद्यमान अध्यक्ष अश्विनी कदम यांची अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होत असल्याने त्याही पदासाठी निवडणूक होईल.पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची आघाडी आहे. आघाडीमध्ये झालेल्या पदवाटपानुसार यंदा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये अविनाश बागवे, चंद्रकांत कदम यांच्यात स्पर्धा आहे. बागवे यांनी समितीतील आपली कामगिरी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवत या पदासाठी दावा केला आहे. कदम यांनी आतापर्यंत आपल्याला डावलेले गेले आहे, त्यामुळे आता हे पद द्यावे, अशी मागणी केली असल्याचे समजते. त्याचबरोबर निवृत्त होणारे सदस्य मुकारी अलगुडे यांच्या जागेवर नव्याने नियुक्त होणारे सदस्यही या पदासाठी दावा करू शकतात. मात्र, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नगरसेवकांचे मत काँग्रेसला समितीचे अध्यक्षपद देऊ नये, असे आहे. पालिकेच्या पंचवार्षिकचे हे अखेरचे वर्ष आहे. नवी सार्वत्रिक निवडणूक या वर्षअखेरीस होईल. त्यामुळे स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या आर्थिक समितीचे पद काँग्रेसला देऊन आपल्या पायावर धोंडा टाकून घेऊ नये, असे राष्ट्रवादीच्या प्रमुख नगरसेवकांना वाटते. त्यांनी तसे स्पष्टपणे पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कळवले असल्याचे समजते. पवार यांनीच मागील अध्यक्षपद निवडीच्या वेळी काँग्रेसला हे पद देण्याचा शब्द दिला होता. आता तो शब्द पाळायचा की राजकीय महत्त्व लक्षात घेऊन अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवायचे, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)