शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

महापौरपदाबरोबरच आता स्थायी समितीसाठीही रस्सीखेच

By admin | Updated: January 8, 2016 01:46 IST

महापौरबदलाच्या हालचाली सध्या थंडावलेल्या असल्या, तरी राष्ट्रवादीअंतर्गत काही नावांमध्ये चुरस सुरूच आहे. त्याचबरोबर आता स्थायी समितीच्या

पुणे : महापौरबदलाच्या हालचाली सध्या थंडावलेल्या असल्या, तरी राष्ट्रवादीअंतर्गत काही नावांमध्ये चुरस सुरूच आहे. त्याचबरोबर आता स्थायी समितीच्या सदस्य व अध्यक्षपदासाठीही रस्सीखेच सुरू झाली आहे. आघाडी धर्म पाळून समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला द्यायचे की तोंडावर आलेली सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन स्वत:कडेच ठेवायचे, याचा निर्णय राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांना घ्यावा लागणार आहे.नियमाप्रमाणे फेब्रुवारीअखेर स्थायी समितीचे आठ सदस्य त्यांची दोन वर्षांची मुदत पूर्ण होत असल्याने निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीचे सभागृह नेते बंडू केमसे, समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे, नंदा लोणकर, शारदा ओरसे, राजश्री आंदेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहुल तुपेरे, अनिल राणे व काँग्रेसचे मुकारी अलगुडे हे सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर त्या-त्या पक्षाचे तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातील. सदस्य निवडीनंतर लगेचच मार्चमध्ये समितीच्या विद्यमान अध्यक्ष अश्विनी कदम यांची अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होत असल्याने त्याही पदासाठी निवडणूक होईल.पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची आघाडी आहे. आघाडीमध्ये झालेल्या पदवाटपानुसार यंदा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये अविनाश बागवे, चंद्रकांत कदम यांच्यात स्पर्धा आहे. बागवे यांनी समितीतील आपली कामगिरी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवत या पदासाठी दावा केला आहे. कदम यांनी आतापर्यंत आपल्याला डावलेले गेले आहे, त्यामुळे आता हे पद द्यावे, अशी मागणी केली असल्याचे समजते. त्याचबरोबर निवृत्त होणारे सदस्य मुकारी अलगुडे यांच्या जागेवर नव्याने नियुक्त होणारे सदस्यही या पदासाठी दावा करू शकतात. मात्र, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नगरसेवकांचे मत काँग्रेसला समितीचे अध्यक्षपद देऊ नये, असे आहे. पालिकेच्या पंचवार्षिकचे हे अखेरचे वर्ष आहे. नवी सार्वत्रिक निवडणूक या वर्षअखेरीस होईल. त्यामुळे स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या आर्थिक समितीचे पद काँग्रेसला देऊन आपल्या पायावर धोंडा टाकून घेऊ नये, असे राष्ट्रवादीच्या प्रमुख नगरसेवकांना वाटते. त्यांनी तसे स्पष्टपणे पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कळवले असल्याचे समजते. पवार यांनीच मागील अध्यक्षपद निवडीच्या वेळी काँग्रेसला हे पद देण्याचा शब्द दिला होता. आता तो शब्द पाळायचा की राजकीय महत्त्व लक्षात घेऊन अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवायचे, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)