शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बरोबर घेऊनच विमानतळ

By admin | Updated: November 18, 2016 06:07 IST

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ हे येथील जनतेला त्रास, कष्ट, पीडा देऊन, त्यांचा जीव घेऊन होणार नाही, तर विश्वासात घेऊन त्यांना

खळद : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ हे येथील जनतेला त्रास, कष्ट, पीडा देऊन, त्यांचा जीव घेऊन होणार नाही, तर विश्वासात घेऊन त्यांना पसंत पडले, त्यांनी मान्यता दिली तरच विमानतळ होईल, असा विश्वास येथील बाधित गावांतील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी दिला. याकामी प्राथमिक अवस्थेत होत असणाऱ्या ओएलएस सर्व्हेला सहकार्य करण्याची विनंती केली.पारगाव मेमाणे येथे पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानळासाठी बाधित होणाऱ्या गावच्या शेतकऱ्यांशी आज त्यांनी जाहीर चर्चा केली.यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जय जाधव, विमानतळ प्राधिकरणाच्या कटारिया मॅडम, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, भाजपा युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, प्रांत संजय अस्वले, तहसीलदार सचिन गिरी, पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक भरते, सासवडचे पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंह गौड, जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, मंडलाधिकारी संजय बडधे आदी प्रमुख उपस्थित होते.या वेळी बोलताना जिल्हाधिकारी राव यांनी, सर्व्हे म्हणजे विमानतळ झाले असे नाही, तर हा सर्व्हे झाल्यानंतरच ही जागा विमानतळासाठी योग्य की अयोग्य, हे ठरणार आहे. हा सर्व्हे ज्यावेळी होईल त्यावेळी मी पुन्हा तुमच्यासमोर चर्चेसाठी येईल व त्यावेळी विमानतळासाठी किती सरकारी जागा जात आहे, वनविभागाची जमीन किती जात आहे व कोणते गावठाण जात आहे, कोणाची बागायती जमीन जात आहे हे संपूर्ण चित्र तुमच्या समोर मांडले जाईल, यामध्ये आपल्या विचारानेच क्षेत्र आजूबाजूला सरकवत कमीत कमी शेतजमीन जाईल याचा प्रयत्न केला जाईल. त्यावर आपली संमती असेल तरच पुढील चर्चा होईल. नकार देण्यापूर्वी प्रक्रिया काय आहे, प्रकल्प कसा आहे ते समजून घ्या असे आवाहन केले. यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनीही शेतकऱ्यांची समजूत काढली. यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने सर्वेक्षण होऊ देणार नाही. अकरा महिने राहिल्यानंतर घर सोडताना भाडेकरूलाही त्रास होतो तर आमच्या अनेक पिढ्या येथे गेल्या आहेत. आमच्या भावनांचा विचार करा. हुकूमशाही करू नका. दिवाळीसुद्धा केली नाही.अशा विविध विरोधी प्रतिक्रिया पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, सुनंदा खेडेकर, महादेव कुंभारकर, पोपट मेमाणे, चंद्रकांत फुले, पंडोल, राणी झुरंगे, देविदास कामथे, नंदा टिळेकर, अमोल कामथे, राहुल कुंभारकर, सतीश कुंभारकर, मनीषा होले, अर्चना मेमाणे, मगराज राठी , दत्ता झुरंगे यांनी मांडल्या. गणेश मेमाणे यांनी नागरिकांना आपले मत शांततेत मांडण्याचे व जिल्हाधिकारी साहेबांचे विचार शांततेत ऐकण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)