शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बरोबर घेऊनच विमानतळ

By admin | Updated: November 18, 2016 06:07 IST

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ हे येथील जनतेला त्रास, कष्ट, पीडा देऊन, त्यांचा जीव घेऊन होणार नाही, तर विश्वासात घेऊन त्यांना

खळद : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ हे येथील जनतेला त्रास, कष्ट, पीडा देऊन, त्यांचा जीव घेऊन होणार नाही, तर विश्वासात घेऊन त्यांना पसंत पडले, त्यांनी मान्यता दिली तरच विमानतळ होईल, असा विश्वास येथील बाधित गावांतील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी दिला. याकामी प्राथमिक अवस्थेत होत असणाऱ्या ओएलएस सर्व्हेला सहकार्य करण्याची विनंती केली.पारगाव मेमाणे येथे पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानळासाठी बाधित होणाऱ्या गावच्या शेतकऱ्यांशी आज त्यांनी जाहीर चर्चा केली.यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जय जाधव, विमानतळ प्राधिकरणाच्या कटारिया मॅडम, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, भाजपा युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, प्रांत संजय अस्वले, तहसीलदार सचिन गिरी, पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक भरते, सासवडचे पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंह गौड, जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, मंडलाधिकारी संजय बडधे आदी प्रमुख उपस्थित होते.या वेळी बोलताना जिल्हाधिकारी राव यांनी, सर्व्हे म्हणजे विमानतळ झाले असे नाही, तर हा सर्व्हे झाल्यानंतरच ही जागा विमानतळासाठी योग्य की अयोग्य, हे ठरणार आहे. हा सर्व्हे ज्यावेळी होईल त्यावेळी मी पुन्हा तुमच्यासमोर चर्चेसाठी येईल व त्यावेळी विमानतळासाठी किती सरकारी जागा जात आहे, वनविभागाची जमीन किती जात आहे व कोणते गावठाण जात आहे, कोणाची बागायती जमीन जात आहे हे संपूर्ण चित्र तुमच्या समोर मांडले जाईल, यामध्ये आपल्या विचारानेच क्षेत्र आजूबाजूला सरकवत कमीत कमी शेतजमीन जाईल याचा प्रयत्न केला जाईल. त्यावर आपली संमती असेल तरच पुढील चर्चा होईल. नकार देण्यापूर्वी प्रक्रिया काय आहे, प्रकल्प कसा आहे ते समजून घ्या असे आवाहन केले. यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनीही शेतकऱ्यांची समजूत काढली. यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने सर्वेक्षण होऊ देणार नाही. अकरा महिने राहिल्यानंतर घर सोडताना भाडेकरूलाही त्रास होतो तर आमच्या अनेक पिढ्या येथे गेल्या आहेत. आमच्या भावनांचा विचार करा. हुकूमशाही करू नका. दिवाळीसुद्धा केली नाही.अशा विविध विरोधी प्रतिक्रिया पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, सुनंदा खेडेकर, महादेव कुंभारकर, पोपट मेमाणे, चंद्रकांत फुले, पंडोल, राणी झुरंगे, देविदास कामथे, नंदा टिळेकर, अमोल कामथे, राहुल कुंभारकर, सतीश कुंभारकर, मनीषा होले, अर्चना मेमाणे, मगराज राठी , दत्ता झुरंगे यांनी मांडल्या. गणेश मेमाणे यांनी नागरिकांना आपले मत शांततेत मांडण्याचे व जिल्हाधिकारी साहेबांचे विचार शांततेत ऐकण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)