शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

शेतकरी वर्गासोबतच सर्वसामान्य नागरिकही अवकाळीच्या सावटाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

सध्या ढगाळ वातावरणामुळे शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. तरकारी पिकांवर तसेच फळभाज्या, पालेभाज्या व फळांवर ...

सध्या ढगाळ वातावरणामुळे शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. तरकारी पिकांवर तसेच फळभाज्या, पालेभाज्या व फळांवर हिरव्या, पिवळ्या तसेच काळ्या माव्याचा प्रार्दुभाव दिसत असल्याने हाताशी आलेली नगदी पिके रोगास बळी पडत आहेत हे पाहून बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे कितीही औषधे मारली तरीही मावा, अळी, तुडतुडे तसेच सर्वच प्रकारच्या किडी आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही. एकीकडे शेतमालाला बाजारभाव नाही. आणि दुसरीकडे औषधे व औषध फवारणीच्या वाढीव खर्चाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तसेच कांदा पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हरभऱ्यावर घाटे पोखरणाऱ्या अळीचा प्रार्दुभाव दिसुन येत आहे. तर गव्हावर मावा तसेच उसावर लोकरी मावा दिसून येत आहे. त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाची तसेच गारपिटीची शक्यता व्यक्त केल्याने बळीराजा धास्तावला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांवर एकामागून एक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटे येत असल्याने बळीराजा पुर्णपणे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांसमोर वारंवार येत असलेेेली संकटे संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. यांतून दिलासा मिळावा म्हणून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावावा व शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनमधून व्यक्त होत आहे.