शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

प्रबोधनाबरोबरच मानवसेवा व्रताची जपणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:47 IST

भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचविणे, प्रसार करणे, सामाजिक जाणीव ही भावना कायम ठेवून उपक्रम राबविणे, मानवसेवेचे काम करण्याचे काम जैन कॉन्फरन्सच्या वतीने केले जात आहे. साधू-संत सेवा आणि ज्ञानप्रकाश योजना, जीवदया योजनेच्या माध्यमातून समाज सक्षमीकरण केले जात आहे.

भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचविणे, प्रसार करणे, सामाजिक जाणीव ही भावना कायम ठेवून उपक्रम राबविणे, मानवसेवेचे काम करण्याचे काम जैन कॉन्फरन्सच्या वतीने केले जात आहे. साधू-संत सेवा आणि ज्ञानप्रकाश योजना, जीवदया योजनेच्या माध्यमातून समाज सक्षमीकरण केले जात आहे. देशभरात १३ प्रांतांच्या माध्यमातून सुमारे दोन हजार सेवक काम करीत आहेत. तसेच युवक आणि महिला शाखेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, असे मत श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्टÑीय महामंत्री प्रा. अशोक पगारिया यांनी व्यक्त केले.जैन कॉन्फरन्सची स्थापना, उद्देश याबद्दल प्रा. पगारिया म्हणाले, ‘‘एकशे अकरा वर्षांची परंपरा असणारी श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स ही संस्था आहे. देशभरात या संस्थेचे ६५ हजार सदस्य आहेत. जैन समाजामध्ये स्थानकवासी, मंदिर, तेरापंथी, दिगंबर पंथ आहेत. त्यात पूजा आणि भक्ती करण्याच्या पद्धतीत फरक आहे. मात्र, विचारधारा आणि प्रवाह एकच आहे. भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान पोहोचविण्याचे काम जैन कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले जात आहे. देशभरात सुमारे ४२ लाख जैन बांधव आहेत. त्यांपैकी दहा लाख नागरिक स्थानकवासी आहेत. समाजातील नागरिकांमध्ये एकजूट व्हावी. गरजूंना मदतीचा हात मिळावा, समाजातील विविध घटकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने या संस्थेचे काम सुरू असते.१९०६ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. दिल्लीत मुख्यालय आहे, तर देशभरात १३ प्रांत आहेत. या माध्यमातून देशभर कार्य सुरू असते. समाजप्रबोधन आणि महावीरवाणीचा प्रसार हे प्रमुख उद्दिष्ट आहे. श्रमण संघाचे मुख्य आचार्य डॉ. शिवमुनीजी यांच्या नेतृत्वाखाली युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साधू-साध्वी परिवार काम करीत आहे. तसेच महाराष्टÑ प्रवर्तक म्हणून कुंदनऋषीमहाराज कार्यरत आहेत.समाजातील गरजवंतांना मदत, निराधार महिलांना पेन्शन योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तसेच महिलांनाही मानवसेवा या उद्देशाने मदत केली जाते. वर्षभरात देशातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. तसेच सुमारे अडीचशे महिलांना शिलाई मशिनचे वाटप केले आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे.’’सामाजिक उपक्रमांबद्दल पगारिया म्हणाले, ‘‘ज्ञानप्रकाश योजनेअंतर्गत वाचनसंस्कृती वाढीस लावण्यासाठी जैनप्रकाश हे पाक्षिकही सुरू आहे. तीन योजनांवर काम केले जाते. त्यातील पहिली योजना साधू-संतसेवा. देशभरात सुमारे ११०० साधू-साध्वींचे देशभरातील चातुर्मासाचे आयोजन करणे, आहार-विहार व्यवस्थेसाठी मदत करणे, यासाठी कॉन्फरन्स मदत करते. ज्ञानप्रकाश योजनेंतर्गत धार्मिक पुस्तकांची निर्मिती, भगवान महावीर स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धांचे आयोजन केले जाते. जीवदया योजनेंतर्गत विविध भागांतील गोशाळांना मदत, प्राणिमात्रांसाठी चारा उपलब्ध करून देणे, पक्षी-प्राणी यांना अन्न उपलब्ध करून देणे हे उपक्रम आयोजित केले जातात. युवा आणि महिला शाखाही कार्यरत आहेत. संस्थेचे काम सर्वदूर पोहोचविण्यासाठी अध्यक्ष मोहनलाल चोपडा, पारस मोदी, अविनाश चोरडिया, विलास लोढा, केसरीमल बुरड, युवाध्यक्ष शशिकुमार कर्नावट, महिलाध्यक्ष रुचिरा सुराणा कार्यरत आहेत. मानवसेवा योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. शिवमुनीजी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिनिमित्त रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. पंचाहत्तर हजार नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेतला. त्यातून सुमारे ८३ हजार युनिट रक्त जमा झाले. एक लाखापेक्षा अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. तसेच गरीब रुग्णांसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर थेरगाव येथे डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. वडगाव शेरी येथेही एक केंद्र उभारले आहे. त्याच वेळी नाशिक रोड, खेड, चाकण, मराठवाडा, मालेगाव येथेही डायलिसिस सेंटर उभारण्यात येणार आहेत. मानवसेवेचा यज्ञ असाच अखंडपणे सुरू राहणार आहे.