शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येची परवानगी द्या

By admin | Updated: April 24, 2017 04:57 IST

कृषी सेवक भरतीसाठी भारांकन पद्धतीचा अवलंब करण्याच्या शासन निर्णयाला परीक्षार्थी उमेदवारांनी तीव्रविरोध केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

पुणे : कृषी सेवक भरतीसाठी भारांकन पद्धतीचा अवलंब करण्याच्या शासन निर्णयाला परीक्षार्थी उमेदवारांनी तीव्रविरोध केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षार्थींना न्याय द्यावा, अन्यथा पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर फाशी घेऊन आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कृषी पदवीधरांनी केली आहे. त्याच प्रमाणे शासनाने यासंदर्भातील अध्यादेश मागे घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी)भरती प्रक्रिया राबवावी या मागणीचे निवेदन फडणवीस यांना पाठविले आहे.राज्याच्या कृषी सेवक पदाच्या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे परीक्षेची निवड यादी रद्द करण्यात आली. मात्र, या प्रकरणी दोषींची चौकशी करून त्यांच्यावर करवाई करण्यात आली नाही. त्यातच सदर परीक्षा नव्याने न घेता शासन निर्णय काढून भारांकन पद्धतीने दहावी आणि कृषी पदवी किंवा पदविका परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे सेवकांची निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यास परीक्षार्थी उमेदवारांचा विरोध असून भारांकनाचा निर्णय जबरदस्तीने लादला जात असून त्यामुळे अनेकांचे नुकसान होणार आहे, अशी परीक्षार्थी उमेदवारांची भूमिका आहे. भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असताना भरती रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मात्र, भारांकन पद्धतीने भरती करून भ्रष्टाचार करण्याचा आणखी एक मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये संतापाची भावना आहे. शासनाचा हाच पारदर्शी कारभार आहे का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी एमपीएससीतर्फे पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, भरतीत घोटाळा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, कृषी विभागातील विविध अधिकारी पदाची ८०० पदे तत्काळ भरावीत आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.