शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

‘पीएमपी’ ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची द्या परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: पीएमपी बंद असल्याने शहरातील गरजू नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे किमान ५० टक्के क्षमतेने पीएमपी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: पीएमपी बंद असल्याने शहरातील गरजू नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे किमान ५० टक्के क्षमतेने पीएमपी सुरू करण्याची मागणी पीएमपी प्रशासन सरकारकडे करणार आहे. नागरिकांकडून गाडी सुरू करण्यासाठी येत असलेल्या पत्रांचा हवाला त्यासाठी दिला जाणार आहे.

आरोग्यविषयक सर्व नियमांचे आधीही पालन करण्यात येत होते, आताही करण्यात येईल असे कळवण्यात येणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी सांगितले की, नागरिकांची प्रशासनाकडे रोज पीएमपी सुरू करण्यासंबंधी पत्र येत आहेत. विशेषतः मोलकरणी, स्वयंपाक करणाऱ्या महिला यांची फार अडचण झाली आहे. स्वतःचे वाहन नाही, रिक्षा परवडत नाही, यामुळे काम सुरू असूनही त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. अशांसाठी काही मार्गांवर गाड्या सुरू केल्या, तर ५० टक्के प्रमाणे गाड्या सुरू राहतील व त्याचा संबंधित नागरिक तसेच पीएमपीला फायदा होईल.

जगताप म्हणाले की, पीएमपीने कोरोना टाळेबंदीनंतर १ कोटी २५ लाख रुपयांचे रोजच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठले होते. आता पुन्हा पीएमपी पूर्ण बंद झाली आहे. कामगारांच्या वेतनासाठी पीएमपीला दरमहा ४५ कोटी रुपये लागतातच. ५० टक्के क्षमतेने गाड्या सुरू राहिल्या तर त्यातून किमान उत्पन्न मिळेल.

तसेही अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून सध्या ६४ गाड्या सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. सरकारी कर्मचारी, डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी ही विशेष सेवा पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात देण्यात आली आहे. त्याप्रमाणेच दोन्ही शहरांमधील किमान काही मार्गांवर तरी ५० टक्के क्षमतेने पीएमपी सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.