शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

चित्रीकरणास काही कडक नियम लावून परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने मालिका, चित्रपट, वेबसिरीज व लघुपटांच्या चित्रीकरणास बंदी घातली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने मालिका, चित्रपट, वेबसिरीज व लघुपटांच्या चित्रीकरणास बंदी घातली आहे. मात्र, दुसरीकडे इतर राज्यांकडून चित्रीकरणास परवानगी दिली आहे. यामुळे निर्मिती संस्थांकडून आणि वाहिन्यांकडून मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर हलविले आहे. चित्रीकरण बंद असल्याने शासनाचाही महसूल बुडत आहे, त्यामुळे राज्य सरकारने मालिका, चित्रपट, वेबसिरीज आणि लघुपटांच्या चित्रीकरणास काही कडक नियम आणि अटी लागू करून परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

बॉलिवूड ही महाराष्ट्राची शान असून, सध्या हा उद्योग महाराष्ट्राबाहेर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापासून वेळीच सावध होऊन या उद्योगाला संजीवनी द्या, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

मालिका, चित्रपट, वेबसिरीज आणि लघुपटांच्या चित्रीकरणास पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. त्यामुळे विविध हिंदी वाहिन्यांकडून मालिकांचे चित्रीकरण राज्याबाहेर करत आहे. इतर राज्यांनीही मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. इतर राज्यांमध्ये चित्रीकरण व्यवस्थितपणे आणि योग्य आर्थिक नियोजनात होऊ लागले तर हा उद्योग राज्याबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. या उद्योगावर अवलंबून असणारे महाराष्ट्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्याकडे काम राहणार नाही. काही हजार कोटींचा वार्षिक उलाढाल असणाऱ्या या उद्योगामधून राज्य सरकारलाही मोठा महसूल मिळतो. बॉलिवूड महाराष्ट्राबाहेर हलविण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. यापासून आपण सावध राहणे आवश्यक आहे. हा उद्योग टिकावा, यासाठी चित्रीकरण होणे गरजेचे असून, कडक नियम लागू करून चित्रीकरणास परवानगी द्यायला हवी. कमी लोकांमध्ये चित्रीकरण करणे, सुरक्षित अंतर-मास्क बंधनकारक-सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीचा अवलंब करणे, रोज आरोग्य तपासणी करणे, कोरोना चाचणीही बंधनकारक करणे, सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण टाळणे, असे नियम चित्रीकरणाच्या दरम्यान लागू करण्यात यावेत, असेही निवेदनात सुचविले आहे.