शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

शस्त्रक्रिया परवानगीमुळे अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक डॉक्टरांमध्ये संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:28 IST

सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ या नावाखाली असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या ...

सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ या नावाखाली असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. या निर्णयाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे बंद पुकारण्यात आला. आयुष डॉक्टरांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करत गुलाबी फित लावून काम केले.

------------------

निर्णयाचा विरोध :

साडेचार वर्षे पदवी आणि ३ वर्षे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ५० लाख रुपयांचा बाँड भरुन दोन वर्षे प्रॅक्टिस करावी लागते. त्याशिवाय स्वत:ची प्रॅक्टिस सुरु करता येत नाही. आयुर्वेदिक डॉक्टरांना हे कौशल्य सहा महिन्यांत शिकणे शक्य नाही. कौशल्य पूर्णपणे अवगत नसताना शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्याची जबाबदारी कोण घेणार? कोणत्या अ‍ॅलोपथी डॉक्टरांनी कोणत्या शस्त्रक्रिया कराव्यात, याबाबत नियम आहे. मग, आयुर्वेद डॉक्टरांना सरसकट परवानगी देणे धोकादायक आहे.

- डॉ. आरती निमकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे

--------------------

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यांना शस्त्रक्रियेचे सखोल प्रशिक्षण देऊन सर्जनचे सहाय्यक म्हणून काम करण्याची परवानगी देता येऊ शकते. मुख्य डॉक्टर आणि रुग्णांमध्ये खूप मोठी गॅप असते. ती भरुन काढण्याचे काम आयुर्वेदिक डॉक्टर करु शकतात. मात्र, त्यांना थेट शस्त्रक्रियेची परवानगी देणे अयोग्य ठरेल.

- डॉ. जगदीश हिरेमठ, ह्रदयरोगतज्ज्ञ

--------------------

निर्णयाचे स्वागत :

कायद्यामध्ये नवीन काहीच नाही. आयुर्वेदात ४० वर्षांपासून शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. राजपत्रामुळे केवळ कायद्यात सुस्पष्टता आली आहे. दीड लाख आयुष डॉक्टरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. गुलाबी फीत लावून पाठिंबा दिला आहे, रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. या निर्णयातून आयुर्वेदाला चालना मिळणार आहे. आयएमए या निर्णयाला विरोध करुन एकाधिकारशाहीची भूमिका घेत आहे. वैद्यकशास्त्र ही कोणाचीही मक्तेदारी नाही. मिक्सोपॅथीचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अ‍ॅलोपॅथीच आहे. सुश्रुतसंहितेमध्ये ३०० हून अधिक शस्त्रक्रियांचा उल्लेख आहे, हे विसरुन चालणार नाही.

- डॉ. आशुतोष गुप्ता, सचिव, आयुष कृती समिती

-------------------

कोणतेही तंत्र हे शास्त्रातील क्रांती असते. वैद्यकशास्त्रही आधुनिक होत आहे. १९९१ पासूनच आयुर्वेदिक डॉक्टर शस्त्रक्रिया करत आहेत. त्यामुळे सीसीआयएमच्या निर्णयातून नवा कोणताही नियम पुढे आलेला नाही. हे तुमचे, ते आमचे असे करणे योग्य नाही.

- डॉ. श्रीकांत काशीकर, आयुर्वेदतज्ज्ञ