शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय सत्कार ही पुण्याची संस्कृती

By admin | Updated: January 19, 2015 00:14 IST

राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असताना सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन सत्कार करणे हे मोलाचे उदाहरण आहे. गिरीश बापट यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांत मित्र जोडले.

पुणे : राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असताना सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन सत्कार करणे हे मोलाचे उदाहरण आहे. गिरीश बापट यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांत मित्र जोडले. पुण्याची ही राजकीय संस्कृती आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून परिचित असलेले पालकंमत्री गिरीश बापट यांचा रविवारी सर्वपक्षीय सत्कार बालगंधर्व रंगमंदिरात झाला. या वेळी दानवे बोलत होते. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर दत्तात्रय धनकवडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, बाळा नांदगावकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री शशिकांत सुतार, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, बापट यांच्या सौभाग्यवती गिरिजा आणि पुत्र गौरव आदी व्यासपीठावर होते. दानवे म्हणाले, ‘‘ सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा ‘भाऊ’ आहे. पक्षविरहित मैत्री त्यांनी जपली. राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असतात. अशा वेळी सर्व पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सत्कार करणे अत्यंत मोलाचे आहे. गिरीश बापट आणि मी भारतीय जनता पक्षाचे संस्थापक-सदस्य आहोत. ’’पाटील म्हणाले, ‘‘ गिरीश बापट म्हणजे डोक्यावर बर्फ, तोंडात साखर. जाती धर्मापलीकडे, आपले वाटणारे बापट सर्वांना आपला भाऊ असावा, असे आहेत. राजकारणात मतभिन्नता असताना त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मतैक्य असणे हे अपूर्व आहे. ’’रावते म्हणाले, ‘‘ बापट यांनी प्रामाणिकपणाचे पावित्र्य राजकारणात सांभाळले. पक्षासाठी कडवट असले, तरी सर्वपक्षीयांशी त्यांची मैत्री आहे. सरकारचे कान उपटणारा, झिंज्या धरणारा आमदारच विधानसभेत असावा, असा बाळासाहेब ठाकरे यांचा बापट यांना आशीर्वाद होता.’’पवार म्हणाले, ‘‘सामाजिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बापट यांचा सर्वपक्षीय सत्कार ही मोठी बाब आहे. ’’नांदगावकर म्हणाले, ‘‘राजकारणात डागाळलेली माणसे खूप असताना बापट निष्कलंक, चारित्र्यवान आहेत. अजातशत्रू मित्राचा नागरी सत्कार ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांच्या पक्षावर टीका केली, तरी त्यांनी आमच्याविषयी कटुता बाळगली नाही. ’’सत्काराला उत्तर देताना बापट म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या पक्षांमधील कार्यकर्त्यांची मने कलुषित होतात. एखाद्या वेळी त्याचे रूपांतर खुनात होते. राजकीय अस्पृश्यता संपायला हवी. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत राजकारणातही यायला हवी. मला मित्र जमविण्याचे वेड आहे. मित्रांचे ऋण आयुष्यात विसरू शकत नाही. समोरचा जरी चांगला वागला नाही, तरी आपण त्याच्याशी चांगले वागायचे, हे माझे तत्त्व आहे. मंत्री झालो तरी मी सामान्य माणसासारखाच राहणार. ’’महापौर, वंदना चव्हाण यांचीही भाषणे झाली. सूर्यकांत पाठक यांनी मानपत्राचे वाचन केले. अशोक येनपुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)