शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

सर्वपक्षीय सत्कार ही पुण्याची संस्कृती

By admin | Updated: January 19, 2015 00:14 IST

राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असताना सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन सत्कार करणे हे मोलाचे उदाहरण आहे. गिरीश बापट यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांत मित्र जोडले.

पुणे : राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असताना सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन सत्कार करणे हे मोलाचे उदाहरण आहे. गिरीश बापट यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांत मित्र जोडले. पुण्याची ही राजकीय संस्कृती आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून परिचित असलेले पालकंमत्री गिरीश बापट यांचा रविवारी सर्वपक्षीय सत्कार बालगंधर्व रंगमंदिरात झाला. या वेळी दानवे बोलत होते. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर दत्तात्रय धनकवडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, बाळा नांदगावकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री शशिकांत सुतार, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, बापट यांच्या सौभाग्यवती गिरिजा आणि पुत्र गौरव आदी व्यासपीठावर होते. दानवे म्हणाले, ‘‘ सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा ‘भाऊ’ आहे. पक्षविरहित मैत्री त्यांनी जपली. राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असतात. अशा वेळी सर्व पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सत्कार करणे अत्यंत मोलाचे आहे. गिरीश बापट आणि मी भारतीय जनता पक्षाचे संस्थापक-सदस्य आहोत. ’’पाटील म्हणाले, ‘‘ गिरीश बापट म्हणजे डोक्यावर बर्फ, तोंडात साखर. जाती धर्मापलीकडे, आपले वाटणारे बापट सर्वांना आपला भाऊ असावा, असे आहेत. राजकारणात मतभिन्नता असताना त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मतैक्य असणे हे अपूर्व आहे. ’’रावते म्हणाले, ‘‘ बापट यांनी प्रामाणिकपणाचे पावित्र्य राजकारणात सांभाळले. पक्षासाठी कडवट असले, तरी सर्वपक्षीयांशी त्यांची मैत्री आहे. सरकारचे कान उपटणारा, झिंज्या धरणारा आमदारच विधानसभेत असावा, असा बाळासाहेब ठाकरे यांचा बापट यांना आशीर्वाद होता.’’पवार म्हणाले, ‘‘सामाजिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बापट यांचा सर्वपक्षीय सत्कार ही मोठी बाब आहे. ’’नांदगावकर म्हणाले, ‘‘राजकारणात डागाळलेली माणसे खूप असताना बापट निष्कलंक, चारित्र्यवान आहेत. अजातशत्रू मित्राचा नागरी सत्कार ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांच्या पक्षावर टीका केली, तरी त्यांनी आमच्याविषयी कटुता बाळगली नाही. ’’सत्काराला उत्तर देताना बापट म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या पक्षांमधील कार्यकर्त्यांची मने कलुषित होतात. एखाद्या वेळी त्याचे रूपांतर खुनात होते. राजकीय अस्पृश्यता संपायला हवी. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत राजकारणातही यायला हवी. मला मित्र जमविण्याचे वेड आहे. मित्रांचे ऋण आयुष्यात विसरू शकत नाही. समोरचा जरी चांगला वागला नाही, तरी आपण त्याच्याशी चांगले वागायचे, हे माझे तत्त्व आहे. मंत्री झालो तरी मी सामान्य माणसासारखाच राहणार. ’’महापौर, वंदना चव्हाण यांचीही भाषणे झाली. सूर्यकांत पाठक यांनी मानपत्राचे वाचन केले. अशोक येनपुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)