शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणीप्रश्नावर सर्वपक्षीय आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:27 IST

उन्हाळ्याची सुरुवात झाली असतानाच उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू झाली आहे. उपनगरांमधील नागरिकांना प्रामुख्याने त्रास

पुणे : उन्हाळ्याची सुरुवात झाली असतानाच उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू झाली आहे. उपनगरांमधील नागरिकांना प्रामुख्याने त्रास होत असून तेथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याविरोधात शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत आक्रमक धोरण स्वीकारत प्रशासनावर टीका केली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी त्यांना उत्तरे देत समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही.महापौर मुक्ता टिळक यांनी सभेचे कामकाज सुरू करताच पाण्याच्या प्रश्नावर सर्वच नगरसेवकांनी टीका सुरू केली. शहरात कुठे ८ तास, तर कुठे पाणीच येत नसल्याची ओरड सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. धानोरी, नगररोड, लोहगाव, हडपसर, कात्रज, कोथरूड भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.हडपसर परिसरात असमान पाणीपुरवठा होत आहे. आयुक्तांनी पाचवा पंप सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा प्रमोद भानगिरे यांनी दिला. प्राची आल्हाट यांनी प्रशासन पाण्याच्या प्रश्नासंदर्भात गंभीर नसल्याची टीका केली.हांडेवाडी, महंमदवाडी परिसरात केवळ १० ते १५ मिनिटेच पाणी येत असल्याची तक्रारही या वेळी करण्यात आली. भाजपाच्या संजय घुले यांनी आपणही सध्याच्या विरोधकांनी केला त्याचप्रमाणे कारभार करतो आहोत, असे म्हणत सत्ताधाºयांना घरचा अहेर दिला.कोथरूड गावठाणात चढउतारामुळे पाणी येत नसल्याचे थातूरमातूर उत्तर अधिकारी देत असल्याचे नगरसेविका हर्षाली माथवड यांनी सांगितले. दरवर्षी पाण्यावर चर्चा होते.पाणी साठवण टाकीसाठी खासगी जागामालक जागा द्यायला तयार आहे. गेली अनेक वर्षे त्यासाठी प्रयत्न करतो आहे, मात्र प्रशासनाला हे काम करायचेच नाही, असे वसंत मोरे यांनी सांगितले.