शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पाणीप्रश्नावर सर्वपक्षीय आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:27 IST

उन्हाळ्याची सुरुवात झाली असतानाच उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू झाली आहे. उपनगरांमधील नागरिकांना प्रामुख्याने त्रास

पुणे : उन्हाळ्याची सुरुवात झाली असतानाच उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू झाली आहे. उपनगरांमधील नागरिकांना प्रामुख्याने त्रास होत असून तेथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याविरोधात शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत आक्रमक धोरण स्वीकारत प्रशासनावर टीका केली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी त्यांना उत्तरे देत समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही.महापौर मुक्ता टिळक यांनी सभेचे कामकाज सुरू करताच पाण्याच्या प्रश्नावर सर्वच नगरसेवकांनी टीका सुरू केली. शहरात कुठे ८ तास, तर कुठे पाणीच येत नसल्याची ओरड सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. धानोरी, नगररोड, लोहगाव, हडपसर, कात्रज, कोथरूड भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.हडपसर परिसरात असमान पाणीपुरवठा होत आहे. आयुक्तांनी पाचवा पंप सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा प्रमोद भानगिरे यांनी दिला. प्राची आल्हाट यांनी प्रशासन पाण्याच्या प्रश्नासंदर्भात गंभीर नसल्याची टीका केली.हांडेवाडी, महंमदवाडी परिसरात केवळ १० ते १५ मिनिटेच पाणी येत असल्याची तक्रारही या वेळी करण्यात आली. भाजपाच्या संजय घुले यांनी आपणही सध्याच्या विरोधकांनी केला त्याचप्रमाणे कारभार करतो आहोत, असे म्हणत सत्ताधाºयांना घरचा अहेर दिला.कोथरूड गावठाणात चढउतारामुळे पाणी येत नसल्याचे थातूरमातूर उत्तर अधिकारी देत असल्याचे नगरसेविका हर्षाली माथवड यांनी सांगितले. दरवर्षी पाण्यावर चर्चा होते.पाणी साठवण टाकीसाठी खासगी जागामालक जागा द्यायला तयार आहे. गेली अनेक वर्षे त्यासाठी प्रयत्न करतो आहे, मात्र प्रशासनाला हे काम करायचेच नाही, असे वसंत मोरे यांनी सांगितले.