शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

चिऊताईला जपण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज : अन्यथा चिऊताई लोप पावेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:10 IST

-- खोडद : अनेक पिढ्यांनी ऐकलेल्या कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताई ही साऱ्यांची लाडकी. मात्र तिचे प्रमाण दिवसेंदिवस कमी ...

--

खोडद : अनेक पिढ्यांनी ऐकलेल्या कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताई ही साऱ्यांची लाडकी. मात्र तिचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले असून आपल्या या लाडक्या चिऊताईला जपण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे. अन्यथा चिमणी ही केवळ चित्रात दाखविण्यपुरती उरेल.

चिमणी वाचविण्यासाठी दरवर्षी २० मार्च हा जगभरात 'चिमणी दिन' म्हणून साजरा केला जातो. चिऊताईचे संवर्धन करण्यासाठी खऱ्या अर्थाने चिमण्यांचा अधिवास जपण्याची गरज आहे. चिऊताई संपली तर आपल्याला संपायला फार वेळ लागणार नाही.

१९५८ मध्ये चीन मध्ये मच्छर,माशी,उंदीर आणि चिमण्या मारायची मोहीम हाती घेण्यात आली. मच्छर मुळे मलेरिया, माशी मुळे कॉलरा, उंदरांमुळे प्लेग होतो आणि चिमण्या अन्नधान्याचा साठा कमी करतात. म्हणून या चौघांना मारण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आला. मच्छर, माशी आणि उंदीर हे चपळ असल्याने त्यांनी त्यांचा जीव वाचविला. चिमण्या मात्र स्वतःला वाचवू शकल्या नाहीत. जो अधिक चिमण्या मरेल त्याला बक्षिस देण्याचे जाहीर करण्यात आले. नागरिक लोखंडी भांडी, लोखंडी पत्रे वाजवून चिमण्यांना झाडावर बसू दिले नाही. चिमण्यांची अंडी फोडली जायची तर घरटी पेटवून दिली जायची. आता रस्त्यावर चिमण्यांचे खच पडू लागले. चिमण्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झाली,नव्हे तर चीन मधील चिमण्या नामशेष झाल्या.

१९६० मध्ये पिकांवरील कीटकांचा प्रादुर्भाव एवढा वाढला की अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. अन्नधान्याचा तुटवडा झाल्याने भूकबळी, कुपोषण यामुळे चीनमधील दोन कोटी पन्नास लाख नागरिकांचा मृत्यू झाला. मूठभर धान्य खाणारी चिमणी पोतं भरून धान्य वाचवते हे चीनच्या लक्षात आल्यानंतर त्यांना दुसऱ्या राष्ट्रातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.

कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार केरळ, गुजरात व राजस्थान मध्ये चिमण्यांचे प्रमाण २० टक्के,आंध्र व तेलंगाणा मध्ये ८० टक्के किनारपट्टीच्या भागात ७० ते ८० टक्के खाली आले आहे. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अन्नधान्यावरील कीटकांचे प्रमाण कमी झाल्याने चिमण्यांना त्यांचे अन्न मिळत नाही.

--

कोट १

पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्यांचे प्रमाण कमी होणे हा गंभीर प्रश्न आहे.चिऊताईसाठी घराबाहेर 'मूठभर धान्य व वाटीभर पाणी' हा उपक्रम प्रत्येकाने राबवायला हवा,जेणेकरून चिमण्यांचा धान्य व पाण्याअभावी मृत्यू होणार नाही." - उत्तम सदाकाळ, पक्षी व निसर्ग अभ्यासक,

--

फोटो १९ खोडद चिउताई