शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

चिऊताईला जपण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज : अन्यथा चिऊताई लोप पावेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:10 IST

-- खोडद : अनेक पिढ्यांनी ऐकलेल्या कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताई ही साऱ्यांची लाडकी. मात्र तिचे प्रमाण दिवसेंदिवस कमी ...

--

खोडद : अनेक पिढ्यांनी ऐकलेल्या कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताई ही साऱ्यांची लाडकी. मात्र तिचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले असून आपल्या या लाडक्या चिऊताईला जपण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे. अन्यथा चिमणी ही केवळ चित्रात दाखविण्यपुरती उरेल.

चिमणी वाचविण्यासाठी दरवर्षी २० मार्च हा जगभरात 'चिमणी दिन' म्हणून साजरा केला जातो. चिऊताईचे संवर्धन करण्यासाठी खऱ्या अर्थाने चिमण्यांचा अधिवास जपण्याची गरज आहे. चिऊताई संपली तर आपल्याला संपायला फार वेळ लागणार नाही.

१९५८ मध्ये चीन मध्ये मच्छर,माशी,उंदीर आणि चिमण्या मारायची मोहीम हाती घेण्यात आली. मच्छर मुळे मलेरिया, माशी मुळे कॉलरा, उंदरांमुळे प्लेग होतो आणि चिमण्या अन्नधान्याचा साठा कमी करतात. म्हणून या चौघांना मारण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आला. मच्छर, माशी आणि उंदीर हे चपळ असल्याने त्यांनी त्यांचा जीव वाचविला. चिमण्या मात्र स्वतःला वाचवू शकल्या नाहीत. जो अधिक चिमण्या मरेल त्याला बक्षिस देण्याचे जाहीर करण्यात आले. नागरिक लोखंडी भांडी, लोखंडी पत्रे वाजवून चिमण्यांना झाडावर बसू दिले नाही. चिमण्यांची अंडी फोडली जायची तर घरटी पेटवून दिली जायची. आता रस्त्यावर चिमण्यांचे खच पडू लागले. चिमण्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झाली,नव्हे तर चीन मधील चिमण्या नामशेष झाल्या.

१९६० मध्ये पिकांवरील कीटकांचा प्रादुर्भाव एवढा वाढला की अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. अन्नधान्याचा तुटवडा झाल्याने भूकबळी, कुपोषण यामुळे चीनमधील दोन कोटी पन्नास लाख नागरिकांचा मृत्यू झाला. मूठभर धान्य खाणारी चिमणी पोतं भरून धान्य वाचवते हे चीनच्या लक्षात आल्यानंतर त्यांना दुसऱ्या राष्ट्रातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.

कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार केरळ, गुजरात व राजस्थान मध्ये चिमण्यांचे प्रमाण २० टक्के,आंध्र व तेलंगाणा मध्ये ८० टक्के किनारपट्टीच्या भागात ७० ते ८० टक्के खाली आले आहे. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अन्नधान्यावरील कीटकांचे प्रमाण कमी झाल्याने चिमण्यांना त्यांचे अन्न मिळत नाही.

--

कोट १

पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्यांचे प्रमाण कमी होणे हा गंभीर प्रश्न आहे.चिऊताईसाठी घराबाहेर 'मूठभर धान्य व वाटीभर पाणी' हा उपक्रम प्रत्येकाने राबवायला हवा,जेणेकरून चिमण्यांचा धान्य व पाण्याअभावी मृत्यू होणार नाही." - उत्तम सदाकाळ, पक्षी व निसर्ग अभ्यासक,

--

फोटो १९ खोडद चिउताई