शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

अलंकापुरी अडकली वाहनकोंडीच्या विळख्यात

By admin | Updated: April 26, 2017 03:00 IST

कोट्यवधींचा विकासआराखडा मंजूर असूनही अपुऱ्या आणि अरुंद रस्त्यांमुळे अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसून

भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगावकोट्यवधींचा विकासआराखडा मंजूर असूनही अपुऱ्या आणि अरुंद रस्त्यांमुळे अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसून, दिवसेंदिवस शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासन्तास वाहनांना ‘ब्रेक’ लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर चक्का जाम होत आहे. यामुळे समस्त अलंकापुरीसह चालक, वाहक, प्रवासी कंटाळले आहे. श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक रोज अलंकापुरीत येत असतात. याबरोबर चाकण औद्योगिक वसाहतीमधील सामानाची ने-आण मोठ्या प्रमाणात अलंकापुरीतूनच होत असते. यामुळे शहरातील रस्ते कायम गजबजलेले असतात. यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागने नित्याचीच बाब झाली आहे. तासन्तास ही कोंडी सोडविणे वाहतूक कर्मचाऱ्यांनाही अशक्यप्राय होऊन जाते. यामुळे वाहने एकाच ठिकाणी खोळंबलेली असतात. सायंकाळच्या वेळी भररस्त्यात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत आहे. सध्या विवाह समारंभाचे अधिक मुहूर्त असल्याने आळंदी नित्याने गजबजलेली असते. शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी विवाह समारंभ पार पडत असल्याने बाहेरील गावावरून वऱ्हाडी लोकांची अनेक वाहने सातत्याने अलंकापुरीत येत असतात; मात्र अशा वाहनांना आळंदीतील वाहतूक कोंडीचा सामना करीत इच्छितस्थळी पोहोचावे लागत असल्याने अपघातजन्य परिस्थिती समोर उभी राहिली जात आहे.आळंदीला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे वडगाव, चाकण, मरकळ बाजूकडून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना अधिक अडचण निर्माण होत आहे. चाकण औद्योगिक वसाहतीकडून आळंदीमार्गे पुणे-नगर मार्गाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागल्या जात आहेत.