शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

अलंकापुरी अडकली वाहनकोंडीच्या विळख्यात

By admin | Updated: April 26, 2017 03:00 IST

कोट्यवधींचा विकासआराखडा मंजूर असूनही अपुऱ्या आणि अरुंद रस्त्यांमुळे अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसून

भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगावकोट्यवधींचा विकासआराखडा मंजूर असूनही अपुऱ्या आणि अरुंद रस्त्यांमुळे अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसून, दिवसेंदिवस शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासन्तास वाहनांना ‘ब्रेक’ लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर चक्का जाम होत आहे. यामुळे समस्त अलंकापुरीसह चालक, वाहक, प्रवासी कंटाळले आहे. श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक रोज अलंकापुरीत येत असतात. याबरोबर चाकण औद्योगिक वसाहतीमधील सामानाची ने-आण मोठ्या प्रमाणात अलंकापुरीतूनच होत असते. यामुळे शहरातील रस्ते कायम गजबजलेले असतात. यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागने नित्याचीच बाब झाली आहे. तासन्तास ही कोंडी सोडविणे वाहतूक कर्मचाऱ्यांनाही अशक्यप्राय होऊन जाते. यामुळे वाहने एकाच ठिकाणी खोळंबलेली असतात. सायंकाळच्या वेळी भररस्त्यात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत आहे. सध्या विवाह समारंभाचे अधिक मुहूर्त असल्याने आळंदी नित्याने गजबजलेली असते. शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी विवाह समारंभ पार पडत असल्याने बाहेरील गावावरून वऱ्हाडी लोकांची अनेक वाहने सातत्याने अलंकापुरीत येत असतात; मात्र अशा वाहनांना आळंदीतील वाहतूक कोंडीचा सामना करीत इच्छितस्थळी पोहोचावे लागत असल्याने अपघातजन्य परिस्थिती समोर उभी राहिली जात आहे.आळंदीला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे वडगाव, चाकण, मरकळ बाजूकडून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना अधिक अडचण निर्माण होत आहे. चाकण औद्योगिक वसाहतीकडून आळंदीमार्गे पुणे-नगर मार्गाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागल्या जात आहेत.