शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

मद्यविक्रीबंदी; पण कारवाईचे काय?

By admin | Updated: April 1, 2017 00:17 IST

राष्ट्रीय आणि राज्यमार्गाच्या लगत असलेल्या मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल्सवर बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

बारामती : राष्ट्रीय आणि राज्यमार्गाच्या लगत असलेल्या मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल्सवर बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करायची कशी, याबाबत पोलीस व उत्पादन शुल्क विभागामध्ये मात्र संभ्रम आहे. अनेक राज्य व राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातून देखील जातात. त्यामुळे ५०० मीटरची मर्यादा राखतानाच आता वीस हजार लोकसंख्येच्या किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या परिसरात २२० मीटर परिसरात आता हॉटेलमध्ये दारुविक्रीला बंदी असणार आहे. मात्र ही बंदी नेमकी कशी घालायची, याबाबत मोठा संभ्रम आहे. याची कार्यवाही करताना उत्पादन शुल्क विभागासाठीदेखील ही डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत महामार्गालगतच्या मद्यविक्री करणाऱ्या दुकान आणि हॉटेल्सला यापूर्वीच नोटीसा देण्यात आल्या आहेत. परंतु, आता नेमकी बंदीची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत कोणत्याही सूचना नसल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत बारामती रेस्टॉरंट, हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल झगडे म्हणाले, आर्थिक मंदीच्या काळात हॉटेल व्यवसायाला अडचणी असताना २२० मीटरपर्यंतच्या हॉटेल मद्यविक्री दुकानांना बंदी घालणे योग्य नाही. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना देखील निवेदन दिले आहे. पाचशे मीटर अंतराच्या आतील दुकान व हॉटेलमध्ये दारुबंदीचा न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. मात्र प्रशासन त्याची कठोर अंमलबजावणी करेल की नाही, याची शंका आहे. उत्पादनशुल्क विभागाने कुणालाही पाठीशी घातले नाही, तरच जनतेला फायदा होईल, असे असल्याचे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)मद्यविक्री करणारे व्यावसायिकदेखील संभ्रमात आहेत. १ एप्रिलला व्यवसाय सुरू ठेवायचा की नाही याबाबत त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. हॉटेलवर कारवाईची टांगती तलवार राहणारचशिरूर तालुक्यात शिरूर, शिक्रापूर व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाना असलेल्या दुकानांमध्ये सद्य:स्थितीत परमिटरूम व बिअरबार ३७, बिअर शॉपी ३१, देशी दारू दुकान ३ व वाईन शॉप ४ आहेत. शिरूर तालुक्यात ९३ पैकी १६ गावांमध्ये अधिकृत दारूविक्रीस परवाने आहेत. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू होत असतो, ही वस्तुस्थिती असल्याने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. अपघात होऊन नयेत यासाठी न्यायालयाने याही बाबीचा विचार करणे गरजेचे आहे, भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनी सांगितले.