शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पाण्यासाठी आळंदीकरांची मानवी साखळी

By admin | Updated: March 29, 2016 03:30 IST

‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे...’ अशा घोषणा देत सोमवारी आळंदीकरांनी प्रदक्षिणा मार्गावर मानवी साखळी धरून आंदोलन केले. आम्हाला फक्त ५ एमएलडी

आळंदी : ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे...’ अशा घोषणा देत सोमवारी आळंदीकरांनी प्रदक्षिणा मार्गावर मानवी साखळी धरून आंदोलन केले. आम्हाला फक्त ५ एमएलडीपाण्याची आवश्यकता आहे. शासनाने याच जलवाहिनीतूनच आळंदीसाठी पाणी द्यावे, अन्यथा ही योजना पूर्ण होऊ देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीयांनी दिला.भामा आसखेडचे पाणी हे आळंदीवरूनच पुढे पुण्यापर्यंत जाणार आहे, असे असताना आळंदीसाठी स्वतंत्र अशी लाइन टाकून खुशाल पाणी घ्या, असे सांगितले जाते. यामुळे आळंदीकर संतप्त झाले आहेत. चाकण चौकातून प्रदक्षिणा मार्गाने भैरोबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आळंदी नगरपालिका चौक, महाद्वारात ठिय्या आंदोलन केले. या वेळी आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, नगरसेवक डी. डी.भासले-पाटील, अशोक कांबळे (उमरगेकर), प्रदीप बवले, सचिन पाचुंदे, उपनगराध्यक्षा अंजनाताई कुऱ्हाडे, माधवी चोरडिया, सुलोचना नेवसे, प्रतिमा गोगावले, अलका बवले, वंदना सोनवणे, उषा नरके, प्रकाश कुऱ्हाडे, रूपाली पानसरे, संदीप नाईकरे, नंदकुमार वडगावकर, सुलतान शेख, मल्हार काळे, अशोक पांढरे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, विविध क्षेत्रांतील मान्यवर, वारकरी सांप्रदायातील भाविक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)