शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

आळंदीत वाहतूक नियोजनाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:47 IST

अलंकापुरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अतिक्रमणे तोडण्यात आली.

आळंदी : अलंकापुरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अतिक्रमणे तोडण्यात आली. तसेच एकेरी वाहतूक योजनाही शहरात राबविण्यात आली. मात्र, या एकेरी वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. त्यात बेशिस्त वाहनचालक थेट माऊली मंदिरापर्यंत गाड्या लावत असल्याने भाविकांना याचा मनस्ताप होत आहे. अवजड वाहनांना बंदी असूनही ही वाहने शहरातूनच जात असल्याने आळंदीतीतील वाहतुकीचा बोजवारा उडला आहे. ‘लोकमत’ने या सर्वांचा घेतलेला आॅन द स्पॉट आढावा.तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने तसेच स्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे आळंदीत अवजड वाहनांना बंदी व शहरातून एकेरी मार्ग वाहतुकीचे नियोजन जाहीर केले. मात्र, दुर्लक्षपणामुळे वाहतुकीची कोंडीचा तिढा अजूनही सुटता सुटेना. प्रभावी कार्यवाही करण्यास प्रशासन असमर्थ ठरले आहे. भर कोंडीत वाहने पुढे दामटण्याच्या नादात अपघात तर होत आहेतच या सोबत वादही उद्भवत आहेत. यातून भाविक, नागरिकांची सुरक्षितता, प्रभावी पोलीस बंदोबस्त, सुरळीत वाहतूक, सुरक्षित वाहतूक आदी बाबत समस्या निर्माण झाल्या आहेत.एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक होत असल्याने विकासकामात देखील अडथळा निर्माण होत आहे. प्रभावी सुसंवादाच्याअभावी वाहतूककोंडीवरील नियोजन यशस्वी होताना दिसत नाही. आळंदीत अवजड वाहने दिवसा प्रवेश घेतात. यामुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांनादेखील अडचणीचे ठरत आहे.आळंदीतील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनेसह प्रभावी वाहतूक नियंत्रण विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी एक वर्षापूर्वी दिले होते. मात्र, पोलीस प्रशासनाला याचाही विसर पडलेला दिसतो.आळंदी व दिघी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक, पुणे महानगर परिवहन महामंडळ अधिकारी व आळंदी नगर परिषद अधिकारी व पदाधिकारी आदींची बैठक आळंदीत यापूर्वी घेण्यात आली होती. मात्र या बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रभावी कामकाज होत नसल्याने आळंदीतील रस्ते ओलांडणे तसेच सुरक्षित प्रवास करणे वाढत्या अवजड वाहनांमुळे गैरसोयीचे ठरत आहे.नगर परिषद सभागृहातील अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत एकेरी मार्ग वाहतूक निर्णयाच्या कार्यवाहीबाबत आढावा व कामकाज यावर चर्चा झाली. मात्र कार्यवाही प्रभावी होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.