शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

आकुर्डीत आज समस्यांचा जागर

By admin | Updated: February 9, 2015 04:02 IST

रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकासाकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम आकुर्डी गावठाण प्रभागात

पिंपरी : रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकासाकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम आकुर्डी गावठाण प्रभागात सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.‘पिंपरी चिंचवडचा ऱ्हास आता बास’ ही विशेष मोहीम ‘लोकमत’ने सुरू केली आहे. यातून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जनतेसमोर आणून चर्चा घडविली जात आहे. सामान्य नागरिक, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी चर्चा या उपक्रमातून घडवून आणली जाते. प्रश्न, समस्यावरील चर्चा व त्याचे निराकरण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. ‘लोकमत आपल्या दारी’ हा पहिला उपक्रम चिंचवडमध्ये राबविण्यात आला. त्यानंतर मोरवाडी, पिंपरी, कृष्णानगर, शाहूनगर, संभाजीनगर, केशवनगर, भोसरी, चऱ्होली या प्रभागात राबविण्यात आला. त्यास मोठा प्रतिसादमिळाला. या उपक्रमांच्या माध्यमातून नागरी प्रश्न सोडविले जात असल्याने नागरिकांच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत वसलेल्या आकुर्डी गावठाण प्रभागात (प्रभाग १६) कामगार, कष्टकरी, उच्च, मध्यमवर्गीय नागरीक वास्तव्यास आहे. या परिसरात अजूनही गावपण टिकून आहे. गावजत्रा, ग्रामदैवत खंडेराय उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. एकात्मकतेचे दर्शन विविध उपक्रमांमधून दिसत असते. या भागातील नागरी प्रश्नावर चर्चा घडावी, प्रश्न सुटावेत, याच उद्देशाने पांढारकर सभागृहात ‘लोकमत आपल्या दारी’चे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवक निलेश पांढरकर, नगरसेविका प्रतीभा भालेराव यांच्यासह प्रभागस्तरावरील अधिकारी सहभागी होत आहेत. त्यांच्यासमोर पदपथावरील अतिक्रमणे, रोडरोमीयोंचा त्रास, अरूंद रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, खोदलेले रस्ते, पांडूरंगबुवा काळभोर सभागृह परिसरातील गाळ्यांचे गायब झालेल्या शटर्स, पंचतारानगर परिसरातील कचराकुंड्या, नाल्यांमध्ये साचलेला राडारोडा, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नावर सामान्य नागरिकांना मते मांडता येणार आहे. या प्रश्नावर चर्चा घडवून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)