शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

आकुर्डीत आज समस्यांचा जागर

By admin | Updated: February 9, 2015 04:02 IST

रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकासाकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम आकुर्डी गावठाण प्रभागात

पिंपरी : रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकासाकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम आकुर्डी गावठाण प्रभागात सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.‘पिंपरी चिंचवडचा ऱ्हास आता बास’ ही विशेष मोहीम ‘लोकमत’ने सुरू केली आहे. यातून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जनतेसमोर आणून चर्चा घडविली जात आहे. सामान्य नागरिक, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी चर्चा या उपक्रमातून घडवून आणली जाते. प्रश्न, समस्यावरील चर्चा व त्याचे निराकरण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. ‘लोकमत आपल्या दारी’ हा पहिला उपक्रम चिंचवडमध्ये राबविण्यात आला. त्यानंतर मोरवाडी, पिंपरी, कृष्णानगर, शाहूनगर, संभाजीनगर, केशवनगर, भोसरी, चऱ्होली या प्रभागात राबविण्यात आला. त्यास मोठा प्रतिसादमिळाला. या उपक्रमांच्या माध्यमातून नागरी प्रश्न सोडविले जात असल्याने नागरिकांच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत वसलेल्या आकुर्डी गावठाण प्रभागात (प्रभाग १६) कामगार, कष्टकरी, उच्च, मध्यमवर्गीय नागरीक वास्तव्यास आहे. या परिसरात अजूनही गावपण टिकून आहे. गावजत्रा, ग्रामदैवत खंडेराय उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. एकात्मकतेचे दर्शन विविध उपक्रमांमधून दिसत असते. या भागातील नागरी प्रश्नावर चर्चा घडावी, प्रश्न सुटावेत, याच उद्देशाने पांढारकर सभागृहात ‘लोकमत आपल्या दारी’चे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवक निलेश पांढरकर, नगरसेविका प्रतीभा भालेराव यांच्यासह प्रभागस्तरावरील अधिकारी सहभागी होत आहेत. त्यांच्यासमोर पदपथावरील अतिक्रमणे, रोडरोमीयोंचा त्रास, अरूंद रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, खोदलेले रस्ते, पांडूरंगबुवा काळभोर सभागृह परिसरातील गाळ्यांचे गायब झालेल्या शटर्स, पंचतारानगर परिसरातील कचराकुंड्या, नाल्यांमध्ये साचलेला राडारोडा, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नावर सामान्य नागरिकांना मते मांडता येणार आहे. या प्रश्नावर चर्चा घडवून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)