शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

सर्वसामान्यांना उभे करणारे राजकारणातील राजहंस "अजितदादा पवार"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

सत्ता असताना कधी अहंकार नाही आणि सत्ता नसताना कधी चिडचीड देखील नाही. हा राजकारणातील दुर्मिळ गुण दादांकडे आहे. ...

सत्ता असताना कधी अहंकार नाही आणि सत्ता नसताना कधी चिडचीड देखील नाही. हा राजकारणातील दुर्मिळ गुण दादांकडे आहे. त्यामुळे दादा हे राजकारणातील राजहंस आहेत. प्रतिस्पर्ध्यावर टीका करण्याऐवजी आपण घेतलेले जनहिताचे निर्णय जनतेसमोर ठेवून जनतेच्या कामात रमणे हा देखील एक महत्वाचा गुण त्यांच्यामध्ये दिसून येतो.

जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध देशातील अत्याधुनिक सोयी सुविधांचा अभ्यास करून त्या आपल्या राज्यात राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा कर्तबगार नेता म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो. दादांनी उद्योगनगरी पिंपरी - चिंचवड किंवा बारामती यशस्वीपणे उभारून महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारत देशासमोर रोल मॉडेल उभा केले आहे. लोकांना सतत भेटणारा, कर्तव्य कठोर, घेतलेल्या खात्याच्या कारभारामध्ये कार्यक्षमतेची, आधुनिकतेची जोड देऊन पारदर्शी कारभार करणारा ताकदवान मंत्री म्हणून दादांकडे पाहिले जाते.

सन २०१४ पासून आर्थिक रुळावरून घसरलेली राज्याची गाडी पूर्वपदावर आणत असताना कोरोना सारख्या महाभयंकर काळात न डगमगता राज्याची आर्थिक बाजू समर्थपणे सांभाळत सर्वसामान्यांना उभा करण्याचा प्रयत्न करणारा कष्टाळू मंत्री म्हणून दादांकडे पाहिले जाते. चांगल्या कामात होकार भरणारा आणि लोकोपयोगी नसलेल्या कामांना स्पष्ट नकार देणारा राजकारणातील दुर्मिळगुण त्यांच्यामध्येच दिसतो. काम छोटे असो की मोठे प्रत्येक कामात उच्च गुणवत्ता, उत्तम दर्जा आणि जनतेसाठी उपयुक्तता या बाबींचा आग्रह धरणारा नेता म्हणजे अजितदादा होय.

दादांची स्वच्छ प्रतिमा आणि कारभार यामुळे रोज कितीही आरोप झाले तरी विरोधकांना ते कधीही सिद्ध करता आले नाहीत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शेती अथवा सहकारातील जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवताना त्याला आवश्यक तेवढी ताकद देण्याचा त्यांचा स्वभावगुण, प्रशासनावर असलेली पकड, वेळेला अत्यंत महत्व, रोकठोक बोलणे, कामाचा प्रचंड आवाका, दुरदृष्टी, निर्णयक्षमता ही अजितदादांची बलस्थाने आहेत.

प्रशासनाला शिस्त हवीच त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना देखील शिस्त हवी म्हणून वेळप्रसंगी कठोर वागणारा हा नेता असल्याने त्यामुळे विकासाचे चांगले नियोजन होते. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कार्यकर्त्यांची जवळीक, त्यांच्या सुखदुःखात सामील होणे, अडीअडचाणीच्या वेळी अगदी अनपेक्षित टोकाची मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे दादा कायमकार्यकर्त्यांच्याबगराड्यात असतात. आपल्या सोबतचा कार्यकर्ताहीमोठा झाला पाहिजे अशी त्यांची भावना हेच त्यांच्या यशाचे गमक मानावे लागेल. अत्यंत कठोर असणारे दादा खूप हळवे, खूप संवेदनशील देखील आहेत. परंतु तो त्यांचा गुणठराविक कार्यकर्त्यांनाच माहित आहे.

आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचे बाळकडू आणि सततचे मार्गदर्शनच मा. अजितदादांना आगामी काळात यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. त्यातूनच उभ्या महाराष्ट्राला एक कणखर नेतृत्व लाभेल असा आत्मविश्वास वाटतो. यातूनच तुमच्या आमच्या मनातला महाराष्ट्र उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. सर्वच क्षेत्रात आपले दादापण जगणाऱ्या नामदार अजितदादांना ६२ वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन प्रदीर्घ व्यक्तिगत आणि राजकीय वाटचालीस खूप खुप शुभेच्छा...!

--

प्रदिप गारटकर.

पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी