शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

अजेंड्यावरून मेट्रो, बीआरटी गायब

By admin | Updated: October 7, 2014 06:13 IST

गेल्या काही वर्षांत विधानसभा निवडणूक पहिल्यादाच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व मनसे हे प्रमुख पाच पक्ष स्वतंत्रपणे लढवीत आहेत

पुणे : गेल्या काही वर्षांत विधानसभा निवडणूक पहिल्यादाच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व मनसे हे प्रमुख पाच पक्ष स्वतंत्रपणे लढवीत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात अटीतटीची लढत असल्याने उमेदवाराच्या मतदारसंघातील विकासकामांचे भांडवल केले जात आहे; परंतु राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यातून शहराचे मेट्रो, बीआरटी, पीएमआरडीएचे प्रश्न गायब झाले आहेत.विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईपर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाकडून शहरातील प्रमुख प्रश्नांचा वचननामा तयार करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतर अचानक भाजप-शिवसेना युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे शहरातील आठही मतदारसंघांत पंचरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील प्रश्न दुर्लक्षित होऊन मतदारसंघनिहाय उमेदवारांनी वचननामे तयार केले. त्यामध्ये मतदारसंघातील स्थानिक प्रश्न व विकासकामे मांडली जाऊ लागली आहेत.सध्याची विधानसभा निवडणूकही मतदारसंघनिहाय स्थानिक प्रश्नावर लढविली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या परंपरांगत मतदानाला धक्का लागण्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणूक महापालिका अथवा ग्रामपंचायतीसारखी स्थानिक उमेदवारांच्या विकासकामांवर व व्यक्तिमत्त्वावर होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)