शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ पुरंदरमध्येच होणार

By admin | Updated: July 16, 2017 03:39 IST

पुरंदर विमानतळाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग काही राजकीय लोकांनी आरंभला आहे. मात्र त्यात तथ्य नसून विमानतळ

- लोकमत न्यूज नेटवर्कखळद : पुरंदर विमानतळाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग काही राजकीय लोकांनी आरंभला आहे. मात्र त्यात तथ्य नसून विमानतळ पुरंदरमध्येच होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. ‘पुरंदर विमानतळाची जागा बदलणार’ म्हणून काही वर्तमानपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर पुरंदरसह पश्चिम महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले होते. त्यातच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया न आल्यामुळे आणखी तर्कवितर्कांना उधाण आले होते. याबाबत मंत्री शिवतारे म्हणाले, की आठवडाभर चाललेल्या गावगप्पा मी त्रयस्थपणे पाहत होतो. जनतेतून आणि सर्व स्तरातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे अवलोकन करीत होतो. काही पुढाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असून विमानतळ रद्द झाल्याचे स्वयंघोषित करून ते लोकांनाही भ्रमित करत सुटले आहेत. कधी काळी ठार दुष्काळी असलेला पुरंदर तालुका आता प्रगतीच्या वेगळ्या टप्प्यावर जाणार, हे जाणवल्यामुळे काहींच्या पोटात भलताच गोळा उठला आहे. ज्या खेड तालुक्यात सुरुवातीला विमानतळ नियोजित होते ते लोक आज पश्चात्ताप करीत आहेत. विमानतळ प्राधिकरणाला नाना प्रकारे पटवण्याचा प्रयत्न येथील लोकांनी करून पाहिला. पण सरकार आता पुरंदरवर ठाम आहे. पुण्यातील विमानतळ हे संरक्षण विभागाचे आहे. या विमानतळावरील उड्डाणे आणि लँडिंगला पुरंदर विमानतळामुळे काही अडचण आहे का नाही, याबाबतचे तांत्रिक स्पष्टीकरण डीपीआरमध्ये देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याचा अंतर्भाव करावा, गरज भासल्यास फेरसर्वेक्षण करावे, असे निर्देश संरक्षण मंत्रालयाचे आहेत. त्यामुळे थेट रद्दच्या गप्पा म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला टोलाविमानतळामुळे जगभरचे कारखानदार, गुंतवणूकदार, व्यापारी आणि बहुराष्ट्रीय कंपन्या पुरंदरकडे डोळे लावून आहेत. हे नुसते विमानतळ नाही तर आर्थिक आणि भौतिक विकासाचे महाद्वार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाखो लोकांना त्यातून रोजगार मिळणार आहे. तालुक्याची प्रगती होत असताना अशा वावड्या उठवणाऱ्या लोकांची तालुक्याच्या विकासावर किती श्रद्धा आहे, ते यातून स्पष्ट होते, असा टोलाही विजय शिवतारे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला.