शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

पुणे विभागात अहमदनगर, सोलापूर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST

पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. यामध्ये पुणे विभागात अहमदनगर ...

पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. यामध्ये पुणे विभागात अहमदनगर आणि सोलापूर जिल्हा अव्वल ठरले आहेत. अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याची टक्केवारी ९९.९७ एवढी आहे, तर पुणे जिल्ह्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. पुणे विभागात केवळ ९७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

पुणे विभागात एकूण २ लाख ६५ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ६५ हजार ८०१ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून २ लाख ६५ हजार ७०४ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाची निकालाची एकूण टक्केवारी ९९.९६ आहे. त्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९७, तर मुलांचे ९९.९५ इतके आहे. तर पुनर्परीक्षार्थी अर्थात रिपीटर विद्यार्थ्यांचा पुणे विभागाचा निकाल ९१.८६ टक्‍के लागला आहे. तसेच प्रावीण्यासह प्रथम श्रेणी किंवा ७५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे १ लाख २ हजार ४७६ इतके विद्यार्थी आहेत. तर प्रथम श्रेणी किंवा ६० टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे १ लाख १६ हजार १७२ विद्यार्थी, तर दि्वतीय श्रेणी किंवा ४५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे ४४ हजार ९२८ विद्यार्थी असून उत्तीर्ण श्रेणी किंवा ३५ टक्क्यांच्या पुढे गुणे मिळवणारे २ हजार १२८ विद्यार्थी आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचा निकाल :

अहमदनगर जिल्ह्यातील ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर निकालाची टक्केवारी ९९.९७ इतकी आहे. नगर जिल्ह्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १९ इतकी आहे. मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९९.९८, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९६ टक्के इतकी आहे.

सोलापू जिल्ह्याचा निकाल :

सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार १९६ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी ६५ हजार १९३ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ६५ हजार १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९९.९७ इतकी आहे. सोलापुरात अनुत्तीर्णाची संख्या १७ इतकी आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९६, तर मुलींचे ९९.९८ टक्के इतकी आहे.

पुणे जिल्ह्याचा निकाल :

पुणे जिल्ह्यातील १ लाख ३० हजार २९ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३० हजार २३ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून १ लाख २९ हजार ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९९.९५ इतकी आहे. म्हणजेच पुण्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या फक्‍त ६१ एवढी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९३ टक्के तर मुलींचे ९९.९७ टक्के आहे.