शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

कृषी कायदा काहीही झालं तरी रद्द होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कृषी कायदा काहीही झालं तरी रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कृषी कायदा काहीही झालं तरी रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शेतमाल कुठं ही विकता येणार तरी आंदोलनाचा आग्रह कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकार यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पाटील आले. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार यांनी आंदोलन दिल्ली पुरतं सीमित राहणार नसून, राष्ट्रपतींची भेटणार असल्याचे नुकतेच सांगितले होते. यावर बोलताना पाटील म्हणाले, देशात लोकशाही असल्याने राष्ट्रपतींना कोणीही भेटू शकते. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आमच्या सर्वांना शुभेच्छा असून, ते भेट घेत असतील तर त्याचे स्वागतच आहे.

सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच कृषी कायदा तयार केला आहे. त्या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार असून, केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होते तेच असून, फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेरही आपला शेतमाल विकता येणार आहे. शेतकऱ्यांना ‘एमएसपी’जी अगोदर ऑन पेपर नव्हती ती आता ऑन पेपर येणार असून, सरकार त्यास तयार आहे. असे असताना आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार अशा बोलण्याला काहीच अर्थ नाही.

दरम्यान चंद्रकांत दादांनी हिमालयात जावं या शिवसेनेच्या सल्ल्यावर मात्र उत्तर देणे पाटील यांनी यावेळी शिताफीने टाळलं.