शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

उंडवडी कडेपठार येथे कृषिपंपाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई उंडवडी कडेपठार: गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ...

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई

उंडवडी कडेपठार: गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे हाताला न मिळालेले काम, त्याचबरोबर अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेती अडचणीत आली आहे.

महावितरणच्या ग्राहकांनी कोरोनामुळे जवळजवळ वर्षभर महावितरणचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे वरचेवर थकीत बिल वाढतच आहे. ही थकबाकी न भरल्यामुळे महावितरणाकडून जराडवाडी गावातील बनवाडी येथे बनवाडी ए. जी. आणि बनवाडी इडिशनल अशा दोन ट्रान्सफाॅर्मरचा गुरुवारी (दि. ११) रोजी कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पिकांना पाणी न मिळाल्याने पिके सुकून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. मध्यंतरी वीजबिल माफ करावे, त्यात सूट द्यावी अशी मागणी केली जात होती. त्यातच राजकारणी नेत्यांकडून कोरोना काळातील वीजबिल भरू नका, असे सांगितले जात होते. वीजबिल न भरल्याने त्याची थकबाकी मात्र वरचेवर वाढत गेल्यामुळे बिलाच्या रकमेचा मोठा डोंगरच उभा राहिला असल्याने आता मात्र शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

————————————————

१) बनवाडी ए.जी - कनेक्शन - ३५ - थकबाकी रक्कम - २१,२३,७१९ रुपये.

२) बनवाडी इडिशनल - कनेक्शन- १९ - थकबाकी रक्कम- १४,५६,००० रुपये.

——————————————

शेतक-यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणच्या कर्मचा-यांनी विद्युत रोहित्रचा वीज पुरवठा खंडित केला. मुळातच करोनाच्या, मागील अवकाळी पावसाच्या (ढगफुटी) या संकटातून शेतकरी राजा कसाबसा सावरतो न सावरतो तोच महावितरणने केलेल्या कारवाईमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.

अमोल जराड, शेतकरी बनवाडी.

————————————————

मागील ३ ते ४ वर्षे आमची पूर्ण दुष्काळात गेली आहेत. वीज बिल हे पूर्ण वर्षभरासाठी ढोबळ पद्धतीने आकार ले जाते. पण या परिसरातील विहिरींचे पाणी हे ४ ते ५ महिने पुरते इतर काळ हा कोरडा जातो. परंतु शेती पंपाचे वीज बिल पूर्ण वर्षाचे आकारले जाते ही पध्दत पूर्ण बागायती भागाला लागू होऊ शकते. ग्रामीण परिसरात वर्षाचे बिल आकारले जाते हा जिरायती भागासाठी अन्याय आहे.

-अनिल साळुंके

शेतकरी, जराडवाडी