शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उंडवडी कडेपठार येथे कृषिपंपाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई उंडवडी कडेपठार: गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ...

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई

उंडवडी कडेपठार: गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे हाताला न मिळालेले काम, त्याचबरोबर अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेती अडचणीत आली आहे.

महावितरणच्या ग्राहकांनी कोरोनामुळे जवळजवळ वर्षभर महावितरणचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे वरचेवर थकीत बिल वाढतच आहे. ही थकबाकी न भरल्यामुळे महावितरणाकडून जराडवाडी गावातील बनवाडी येथे बनवाडी ए. जी. आणि बनवाडी इडिशनल अशा दोन ट्रान्सफाॅर्मरचा गुरुवारी (दि. ११) रोजी कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पिकांना पाणी न मिळाल्याने पिके सुकून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. मध्यंतरी वीजबिल माफ करावे, त्यात सूट द्यावी अशी मागणी केली जात होती. त्यातच राजकारणी नेत्यांकडून कोरोना काळातील वीजबिल भरू नका, असे सांगितले जात होते. वीजबिल न भरल्याने त्याची थकबाकी मात्र वरचेवर वाढत गेल्यामुळे बिलाच्या रकमेचा मोठा डोंगरच उभा राहिला असल्याने आता मात्र शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

————————————————

१) बनवाडी ए.जी - कनेक्शन - ३५ - थकबाकी रक्कम - २१,२३,७१९ रुपये.

२) बनवाडी इडिशनल - कनेक्शन- १९ - थकबाकी रक्कम- १४,५६,००० रुपये.

——————————————

शेतक-यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणच्या कर्मचा-यांनी विद्युत रोहित्रचा वीज पुरवठा खंडित केला. मुळातच करोनाच्या, मागील अवकाळी पावसाच्या (ढगफुटी) या संकटातून शेतकरी राजा कसाबसा सावरतो न सावरतो तोच महावितरणने केलेल्या कारवाईमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.

अमोल जराड, शेतकरी बनवाडी.

————————————————

मागील ३ ते ४ वर्षे आमची पूर्ण दुष्काळात गेली आहेत. वीज बिल हे पूर्ण वर्षभरासाठी ढोबळ पद्धतीने आकार ले जाते. पण या परिसरातील विहिरींचे पाणी हे ४ ते ५ महिने पुरते इतर काळ हा कोरडा जातो. परंतु शेती पंपाचे वीज बिल पूर्ण वर्षाचे आकारले जाते ही पध्दत पूर्ण बागायती भागाला लागू होऊ शकते. ग्रामीण परिसरात वर्षाचे बिल आकारले जाते हा जिरायती भागासाठी अन्याय आहे.

-अनिल साळुंके

शेतकरी, जराडवाडी