शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

उंडवडी कडेपठार येथे कृषिपंपाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई उंडवडी कडेपठार: गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ...

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई

उंडवडी कडेपठार: गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे हाताला न मिळालेले काम, त्याचबरोबर अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेती अडचणीत आली आहे.

महावितरणच्या ग्राहकांनी कोरोनामुळे जवळजवळ वर्षभर महावितरणचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे वरचेवर थकीत बिल वाढतच आहे. ही थकबाकी न भरल्यामुळे महावितरणाकडून जराडवाडी गावातील बनवाडी येथे बनवाडी ए. जी. आणि बनवाडी इडिशनल अशा दोन ट्रान्सफाॅर्मरचा गुरुवारी (दि. ११) रोजी कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पिकांना पाणी न मिळाल्याने पिके सुकून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. मध्यंतरी वीजबिल माफ करावे, त्यात सूट द्यावी अशी मागणी केली जात होती. त्यातच राजकारणी नेत्यांकडून कोरोना काळातील वीजबिल भरू नका, असे सांगितले जात होते. वीजबिल न भरल्याने त्याची थकबाकी मात्र वरचेवर वाढत गेल्यामुळे बिलाच्या रकमेचा मोठा डोंगरच उभा राहिला असल्याने आता मात्र शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

————————————————

१) बनवाडी ए.जी - कनेक्शन - ३५ - थकबाकी रक्कम - २१,२३,७१९ रुपये.

२) बनवाडी इडिशनल - कनेक्शन- १९ - थकबाकी रक्कम- १४,५६,००० रुपये.

——————————————

शेतक-यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणच्या कर्मचा-यांनी विद्युत रोहित्रचा वीज पुरवठा खंडित केला. मुळातच करोनाच्या, मागील अवकाळी पावसाच्या (ढगफुटी) या संकटातून शेतकरी राजा कसाबसा सावरतो न सावरतो तोच महावितरणने केलेल्या कारवाईमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.

अमोल जराड, शेतकरी बनवाडी.

————————————————

मागील ३ ते ४ वर्षे आमची पूर्ण दुष्काळात गेली आहेत. वीज बिल हे पूर्ण वर्षभरासाठी ढोबळ पद्धतीने आकार ले जाते. पण या परिसरातील विहिरींचे पाणी हे ४ ते ५ महिने पुरते इतर काळ हा कोरडा जातो. परंतु शेती पंपाचे वीज बिल पूर्ण वर्षाचे आकारले जाते ही पध्दत पूर्ण बागायती भागाला लागू होऊ शकते. ग्रामीण परिसरात वर्षाचे बिल आकारले जाते हा जिरायती भागासाठी अन्याय आहे.

-अनिल साळुंके

शेतकरी, जराडवाडी