शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

उंडवडी कडेपठार येथे कृषिपंपाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई उंडवडी कडेपठार: गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ...

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई

उंडवडी कडेपठार: गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे हाताला न मिळालेले काम, त्याचबरोबर अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेती अडचणीत आली आहे.

महावितरणच्या ग्राहकांनी कोरोनामुळे जवळजवळ वर्षभर महावितरणचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे वरचेवर थकीत बिल वाढतच आहे. ही थकबाकी न भरल्यामुळे महावितरणाकडून जराडवाडी गावातील बनवाडी येथे बनवाडी ए. जी. आणि बनवाडी इडिशनल अशा दोन ट्रान्सफाॅर्मरचा गुरुवारी (दि. ११) रोजी कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पिकांना पाणी न मिळाल्याने पिके सुकून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. मध्यंतरी वीजबिल माफ करावे, त्यात सूट द्यावी अशी मागणी केली जात होती. त्यातच राजकारणी नेत्यांकडून कोरोना काळातील वीजबिल भरू नका, असे सांगितले जात होते. वीजबिल न भरल्याने त्याची थकबाकी मात्र वरचेवर वाढत गेल्यामुळे बिलाच्या रकमेचा मोठा डोंगरच उभा राहिला असल्याने आता मात्र शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

————————————————

१) बनवाडी ए.जी - कनेक्शन - ३५ - थकबाकी रक्कम - २१,२३,७१९ रुपये.

२) बनवाडी इडिशनल - कनेक्शन- १९ - थकबाकी रक्कम- १४,५६,००० रुपये.

——————————————

शेतक-यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणच्या कर्मचा-यांनी विद्युत रोहित्रचा वीज पुरवठा खंडित केला. मुळातच करोनाच्या, मागील अवकाळी पावसाच्या (ढगफुटी) या संकटातून शेतकरी राजा कसाबसा सावरतो न सावरतो तोच महावितरणने केलेल्या कारवाईमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.

अमोल जराड, शेतकरी बनवाडी.

————————————————

मागील ३ ते ४ वर्षे आमची पूर्ण दुष्काळात गेली आहेत. वीज बिल हे पूर्ण वर्षभरासाठी ढोबळ पद्धतीने आकार ले जाते. पण या परिसरातील विहिरींचे पाणी हे ४ ते ५ महिने पुरते इतर काळ हा कोरडा जातो. परंतु शेती पंपाचे वीज बिल पूर्ण वर्षाचे आकारले जाते ही पध्दत पूर्ण बागायती भागाला लागू होऊ शकते. ग्रामीण परिसरात वर्षाचे बिल आकारले जाते हा जिरायती भागासाठी अन्याय आहे.

-अनिल साळुंके

शेतकरी, जराडवाडी