शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

शेतमाल निर्यात वाढली १२ हजार कोटींनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीच्या कालावधीत शेती क्षेत्र मात्र बहराला आले. शेतमालाला स्थानिक व परदेशी बाजारपेठ मिळाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना महामारीच्या कालावधीत शेती क्षेत्र मात्र बहराला आले. शेतमालाला स्थानिक व परदेशी बाजारपेठ मिळाल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली. शेतमाल निर्यातीमध्ये सुमारे बारा हजार कोटींची वाढ झाली.

दुकाने, व्यवसाय, उद्योगधंदे लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले असताना शेतकरी मात्र राबत होता आणि उत्पन्नही मि‌ळवत होता. मार्च ते नोव्हेंबर २०२० या ८ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातून ६६ हजार ४९८ कोटी रूपयांचा शेतमाल निर्यात झाला. गेल्या वर्षी याच काळात ५४ हजार ६५० कोटी रूपयांची उलाढाल भाजीपाला निर्यात क्षेत्रात झाली होती. स्थानिक बाजारपेठेतील उलाढाल यापेक्षाही मोठी आहे.

संपूर्ण जग घरात बंद झाल्यामुळे खाद्यपदार्थांची मागणी वाढली होती. टाळेबंदीतून अत्यावश्यक सेवा म्हणून फळे, भाजीपाला, धान्य वाहतूक तसेच कृषीक्षेत्राशी संबंधित कंपन्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे निर्यातीसाठी आवश्यक जहाजांचे कंटेनर, विमाने तसेच माल वाहतूक करणाऱ्या कंपन्या यांचे काम विना अडथळा सुरू होते. कृषी खाते या काळात काम करत होते.

सरकारी यंत्रणानीही या काळात शेतीक्षेत्राला भरपूर मदत केली. राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यात शेतीचे नुकसान झाले, मात्र या नैसर्गिक संकटातूनही शेतकरी अल्पावधीत सावरला. त्यामुळेही उत्पन्नात फरक पडल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

चौकट

“आमच्या कंपनीचे १० हजार शेतकरी सदस्य आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आम्ही पिकवतो. कोरोना टाळेबंदी काळात आम्ही निर्यात व स्थानिक बाजारपेठेत मिळून अडीचशे कोटी रूपयांची उलाढाल केली. शेतमालाचा दर्जा सांभाळणे, निर्यात मालाच्या सर्व कसोट्या पूर्ण करणे, बाजारपेठेची मागणी या सगळ्याकडे लक्ष ठेवल्याने हे शक्य झाले.”

-विलास शिंदे, संचालक, सह्याद्री फार्म