शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘अग्निहोत्र’ आधारित प्रयोगाला मिळाले पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

पुणे : भारतीय परंपरेतील ‘अग्निहोत्र’वर आधारित प्रयोगाला पेटंट मिळाले असून, ते मिळविण्यात राष्ट्रीय रासायनिक संस्थेचे (एनसीएल) निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ ...

पुणे : भारतीय परंपरेतील ‘अग्निहोत्र’वर आधारित प्रयोगाला पेटंट मिळाले असून, ते मिळविण्यात राष्ट्रीय रासायनिक संस्थेचे (एनसीएल) निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांना यश आले आहे. त्यांच्यासोबत एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रणय दिलीप अभंग यांनी प्रयत्न केले. या तिघांनी अग्निहोत्र विधीचा अभ्यास केला आणि अग्निहोत्रातून निघणाऱ्या धुराचा हवेवर होणारा परिणाम, अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म, त्याने होणारे पाणी शुध्दीकरण, याचे प्रयोगशाळांमध्ये केले होते.

अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे. अग्निहोत्रसाठी गायीचे तूप, हातसडीचा तांदूळ, गायीच्या शेणाच्या गोवऱ्या आणि तांब्याचा पत्रा लागतो. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी १० मिनिटांत करता येतो. अग्निहोत्रासाठी सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा उपयुक्त आहेत.

मोघे म्हणाले,‘‘ अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या जवळजवळ ९० % सूक्ष्मजंतूची वाढ थांबत असल्याचे सिद्ध झाले. प्रयोगासाठी निवडलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले. रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने होते हे आढळले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले.’’

—————————————————

अग्निहोत्रच्या राखेमुळे पाणी शुध्द

अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हेही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.

—————————————————

अग्निहोत्र प्रयोगातील महत्त्वाचे मुद्दे

१. अग्निहोत्रामुळे आकाश व उष्णता उर्जेत बदल

२. धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम

३ धुराचा हवेतील प्रदूषणावर परिणाम

४. धूर व राखेचा रोपांच्या/ बी, बियाण वाढीसाठी उपयोग

५. राखेने पाणी शुद्धीकरण.

————-