शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

‘अग्निहोत्र’ आधारित प्रयोगाला मिळाले पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

पुणे : भारतीय परंपरेतील ‘अग्निहोत्र’वर आधारित प्रयोगाला पेटंट मिळाले असून, ते मिळविण्यात राष्ट्रीय रासायनिक संस्थेचे (एनसीएल) निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ ...

पुणे : भारतीय परंपरेतील ‘अग्निहोत्र’वर आधारित प्रयोगाला पेटंट मिळाले असून, ते मिळविण्यात राष्ट्रीय रासायनिक संस्थेचे (एनसीएल) निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांना यश आले आहे. त्यांच्यासोबत एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रणय दिलीप अभंग यांनी प्रयत्न केले. या तिघांनी अग्निहोत्र विधीचा अभ्यास केला आणि अग्निहोत्रातून निघणाऱ्या धुराचा हवेवर होणारा परिणाम, अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म, त्याने होणारे पाणी शुध्दीकरण, याचे प्रयोगशाळांमध्ये केले होते.

अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे. अग्निहोत्रसाठी गायीचे तूप, हातसडीचा तांदूळ, गायीच्या शेणाच्या गोवऱ्या आणि तांब्याचा पत्रा लागतो. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी १० मिनिटांत करता येतो. अग्निहोत्रासाठी सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा उपयुक्त आहेत.

मोघे म्हणाले,‘‘ अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या जवळजवळ ९० % सूक्ष्मजंतूची वाढ थांबत असल्याचे सिद्ध झाले. प्रयोगासाठी निवडलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले. रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने होते हे आढळले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले.’’

—————————————————

अग्निहोत्रच्या राखेमुळे पाणी शुध्द

अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हेही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.

—————————————————

अग्निहोत्र प्रयोगातील महत्त्वाचे मुद्दे

१. अग्निहोत्रामुळे आकाश व उष्णता उर्जेत बदल

२. धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम

३ धुराचा हवेतील प्रदूषणावर परिणाम

४. धूर व राखेचा रोपांच्या/ बी, बियाण वाढीसाठी उपयोग

५. राखेने पाणी शुद्धीकरण.

————-