शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील आंदोलन शेतीच्या कंपनीकरणाच्या विरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षण, आरोग्य यानंतर आता शेतीचेही कंपनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शिक्षण, आरोग्य यानंतर आता शेतीचेही कंपनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन शेतीच्या या कंपनीकरणाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी केले. हे आंदोलन महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गानेच चालले आहे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

लोकशाही उत्सव समितीच्या वतीने एस. एम. जोशी सभागृहात पाटकर, सीमा कुलकर्णी व नितीश यांचे दिल्लीतील शेतकरी आंदोलना संदर्भात व्याख्यान झाले. तिन्ही वक्त्यांनी केंद्र सरकारची या आंदोलनाकडे पाहण्याची दृष्टी योग्य नसल्याचे सांगितले. विमानतळ, रेल्वेचे कंपनीकरण झाले. यात सरकारची तिजोरी भरते आहे, पण वाढती विषमता बीभस्त होत चालली आहे. त्याविरोधात बोलायचे की नाही? म्हणून आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन पाटकर यांनी केले.

पाटकर म्हणाल्या की, जन आंदोलनाचा समन्वय या संयुक्त मोर्चाच्यावतीने मी स्वतः आंदोलनात सहभागी होते. आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रकार सुरूवातीपासून होता. त्यांच्या घरात ट्रँक्टर आहे? तर तो आंदोलनात दिसणारच! नातेवाईक परदेशात आहेत तर ते मदत करणारच! गावांगावांमधून अन्नधान्य येत होते त्यात गैर काय आहे? कायद्यानेच कमरेला असलेली तलवार, कृपाण आंदोलकांंनी ६० दिवसात कधीच काढली? नाही व प्रजासत्ताक दिनीच कशी काढली? आंदोलनात घुसलेल्यांनीच हा प्रकार केला.

आंदोलन दडपशाहीने दाबून टाकण्याच्या प्रयत्नात सरकार लोकशाहीची चौकट मोडत आहे. सरकार आणि जनता यांच्यातील नातेच केंद्र सरकार संपवून टाकत आहे अशी टीका पाटकर यांनी केली. सीमा कुलकर्णी यांंनी आंदोलनातील महिलांचा सहभाग विषद केला. संसदीय नियमांची पायमल्ली करत तिन्ही कायदे मंजूर केल्याचे नितीश म्हणाले. समितीच्या अध्यक्ष सुनीती सु. र. यांंनी स्वागत केले. सचिव मिलींद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.