शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शयर्तबंदीविरोधात आक्रमक पवित्रा

By admin | Updated: January 24, 2017 01:46 IST

आंबेगाव तालुक्यातील बैलगाडामालकांनी शर्यती पुन्हा सुरू होण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटावी

मंचर : आंबेगाव तालुक्यातील बैलगाडामालकांनी शर्यती पुन्हा सुरू होण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटावी तसेच पेटा संस्थेवर बंदी यावी, या मागणीसाठी रविवारी (दि. २९) मंचर येथे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.तमिळनाडू राज्यात जलीकट्टू स्पर्धेसाठी नागरिक एकवटले आहे. त्या पार्श्वभूमीवर बैलगाडामालकांनी शर्यती सुरू होण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केले आहे. मंचर येथे बैलगाडामालकांची बैठक सोमवारी झाली. त्या बैठकीत पुढील रणनीती आखून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. या वेळी सरपंच दत्ता गांजाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, बैलगाडा विमा योजनेचे अध्यक्ष दत्ता थोरात, याचिकाकर्ते बाळासाहेब आरूडे, बजरंग दलाचे अध्यक्ष सुहास बाणखेले, बैलगाडामालक के. के. थोरात, संतोष मोरडे, संतोष बाणखेले, सरपंच विशाल तोत्रे, राजू निघोट, मयूर वाबळे, शांताराम भय्ये, उपसरपंच शिवाजी निघोट तसेच गाडामालक उपस्थित होते.शेकडो वर्षांची परंपरा असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. न्यायालयीन लढा सुरू असून आता जनमत तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैलगाडामालकांच्या वतीने मंचर येथे येत्या रविवारी आंदोलन करण्यात येणार आहे. पेटा संघटनेवर बंदी घालावी व बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नियोजन आज झालेल्या बैठकीत करण्यात आले. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होणार आहे. सर्व बैलगाडामालक व शौकीन यात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने कायदा करून शर्यतीवरील बंदी उठवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. (वार्ताहर)