शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नेतृत्वावरून काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष

By admin | Updated: January 14, 2017 03:42 IST

कॉँग्रेसमधील वादावादी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरू असून, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी निवासस्थानी

पुणे : कॉँग्रेसमधील वादावादी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरू असून, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी निवासस्थानी बोलावलेल्या कार्ड कमिटीवरून पक्षात खडाजंगी झाल्याची चर्चा सुरू आहे. कार्ड कमिटीची बैठक युवक नेत्यांच्या निवासस्थानी कशासाठी, असा मुद्दा उपस्थित करून आमदार अनंतराव गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी व पक्षाच्या अन्य काही ज्येष्ठ नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याची माहिती मिळाली. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत असलेल्यांना या बैठकीसाठी निमंत्रणच नव्हते. खुद्द बैठकीत उपस्थित नेत्यांमध्येही राष्ट्रवादीबरोबर आघाडी करावी की करू नये यावरून दोन गट पडले. त्यांच्यातच जोरदार शाब्दिक वादावादी झाली असल्याची चर्चा काँग्रेस भवन परिसरात सुरू आहे. पक्षातील काही स्थानिक नेत्यांबरोबर झालेल्या प्राथमिक चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठेवलेला जागा वाटपाचा प्रस्ताव काँग्रेसची मानहानी करणारा आहे असे सांगितले जाते. त्यानुसार सध्या जिथे नगरसेवक आहेत त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील. त्यानंतर ज्या जागा नाहीत त्याठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर जो पक्ष असेल त्या जागा त्यांना द्यायच्या असा हा प्रस्ताव होता. तसे केले तर काँग्रेसला अर्ध्या जागाही मिळणे अवघड होईल. त्यापेक्षा स्वतंत्र लढून पक्षाच्या जास्त जागा येतील असे आघाडी नको म्हणणाऱ्यांचे मत आहे. तर राष्ट्रवादीची ताकद मान्य करून त्यांच्याबरोबर जावे व त्यांच्या ताकदीचा उपयोग करून जागा वाढवाव्यात असे आघाडी हवी असणाऱ्यांना वाटते. या दोन्ही बाबींवर चर्चा होऊन अखेरीस कशावरच एकमत न झाल्याने हा विषय त्या बैठकीत सोडून देण्यात आला अशी माहिती मिळाली.पुण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आहे. मात्र, पतंगराव कदम यांच्यामुळे ते लक्ष घालत नाहीत, अशीही चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)