शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

पुन्हा आशा विमानतळाची

By admin | Updated: October 23, 2016 03:41 IST

गेल्या दहा वर्षांपासून खेड परिसरात विमानतळ होणार, याची आस लावून बसलेल्या खेड तालुक्याला विमानतळ पुरंदरला गेल्यावर मात्र पुन्हा एकदा विमानतळ आपल्याकडे व्हावे, असे वाटू लागले.

केंदूर : गेल्या दहा वर्षांपासून खेड परिसरात विमानतळ होणार, याची आस लावून बसलेल्या खेड तालुक्याला विमानतळ पुरंदरला गेल्यावर मात्र पुन्हा एकदा विमानतळ आपल्याकडे व्हावे, असे वाटू लागले. खेडच्या परिसरातील पूर्व भाग व शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात काही वर्षांपूर्वी सेझच्या माध्यमातून विकास घडविण्यात येणार, या अपेक्षेने येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. शासनाच्या चालू मूल्यांकनानुसार दावडी, निमगाव, कन्हेरसर व केंदूर येथील शेतकऱ्यांना १५ टक्के परताव्यापोटी घेतलेल्या जमिनीस भाव देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु आता पुरंदरला गेलेले विमानतळ परत येईल का, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या ठिकाणी सेझच्या परिसरात अांंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून विकास होणार, या अपेक्षेने येथील नागरिक विचार करीत होता. त्या वेळी सेझबाधित शेतकऱ्यांना १७ लाख रुपये हेक्टरी बाजाराभावाप्रमाणे मोबदला देण्यात आला. शासनाने सेझच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करून एकूण जमिनीच्या मूल्यांतील १५ टक्के परतावा कपात केलेला होता. मात्र, प्रत्यक्षात २२ टक्के रक्कम कपात करण्यात आलेली होती. त्यासाठी बाधित शेतकऱ्यांची ४५० एकर क्षेत्र व कंपनीचे १५० एकर क्षेत्र असे मिळून सुमारे ६०० एकर क्षेत्रावर कंपनी उभी करण्यात येणार होती. त्यापासून मिळणारा लाभ, भाडे बाधित लोकांना देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात आठ वर्षांत कोणतीच कंपनी उभी राहिली नाही. त्यामुळे भागीदारीचा प्रस्तावच शासनाचा खोटा ठरला.सेझची जागा योग्य : १५ टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावाशासनाच्या विश्वासात राहून खेड ते कन्हेरसर या दुपदरी रस्त्यासाठीही येथील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. मात्र, खेड परिसरातील विविध ठिकाणाच्या जागा पाहिल्यानंतर सेझची जागा विमानतळासाठी योग्य असल्याचा एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया यांनी याबाबत अहवालही दिला होता. त्यासंदर्भात उद्योगमंत्री, सेझ अधिकारी, खासदार, आमदार व बाधित शेतकरी यांची बैठकही घेण्यात आली. त्या वेळी खेडच्या सेझमध्येच विमानमतळ होणार असल्याची निश्चितता दिसून येत होती.त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासूनचा विमानतळाचा जागेचा प्रश्न मार्गी लागल्याची चर्चा या भागात सुरू झाली. मात्र, शासनाने भागीदारीचा विषय टाळून १५ टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा येथील बाधित शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पुरंदरमध्ये विमानतळाची घोषणा केल्याने शेतकरी विचारात पडलेला आहे.