शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा आशा विमानतळाची

By admin | Updated: October 23, 2016 03:41 IST

गेल्या दहा वर्षांपासून खेड परिसरात विमानतळ होणार, याची आस लावून बसलेल्या खेड तालुक्याला विमानतळ पुरंदरला गेल्यावर मात्र पुन्हा एकदा विमानतळ आपल्याकडे व्हावे, असे वाटू लागले.

केंदूर : गेल्या दहा वर्षांपासून खेड परिसरात विमानतळ होणार, याची आस लावून बसलेल्या खेड तालुक्याला विमानतळ पुरंदरला गेल्यावर मात्र पुन्हा एकदा विमानतळ आपल्याकडे व्हावे, असे वाटू लागले. खेडच्या परिसरातील पूर्व भाग व शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात काही वर्षांपूर्वी सेझच्या माध्यमातून विकास घडविण्यात येणार, या अपेक्षेने येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. शासनाच्या चालू मूल्यांकनानुसार दावडी, निमगाव, कन्हेरसर व केंदूर येथील शेतकऱ्यांना १५ टक्के परताव्यापोटी घेतलेल्या जमिनीस भाव देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु आता पुरंदरला गेलेले विमानतळ परत येईल का, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या ठिकाणी सेझच्या परिसरात अांंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून विकास होणार, या अपेक्षेने येथील नागरिक विचार करीत होता. त्या वेळी सेझबाधित शेतकऱ्यांना १७ लाख रुपये हेक्टरी बाजाराभावाप्रमाणे मोबदला देण्यात आला. शासनाने सेझच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करून एकूण जमिनीच्या मूल्यांतील १५ टक्के परतावा कपात केलेला होता. मात्र, प्रत्यक्षात २२ टक्के रक्कम कपात करण्यात आलेली होती. त्यासाठी बाधित शेतकऱ्यांची ४५० एकर क्षेत्र व कंपनीचे १५० एकर क्षेत्र असे मिळून सुमारे ६०० एकर क्षेत्रावर कंपनी उभी करण्यात येणार होती. त्यापासून मिळणारा लाभ, भाडे बाधित लोकांना देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात आठ वर्षांत कोणतीच कंपनी उभी राहिली नाही. त्यामुळे भागीदारीचा प्रस्तावच शासनाचा खोटा ठरला.सेझची जागा योग्य : १५ टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावाशासनाच्या विश्वासात राहून खेड ते कन्हेरसर या दुपदरी रस्त्यासाठीही येथील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. मात्र, खेड परिसरातील विविध ठिकाणाच्या जागा पाहिल्यानंतर सेझची जागा विमानतळासाठी योग्य असल्याचा एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया यांनी याबाबत अहवालही दिला होता. त्यासंदर्भात उद्योगमंत्री, सेझ अधिकारी, खासदार, आमदार व बाधित शेतकरी यांची बैठकही घेण्यात आली. त्या वेळी खेडच्या सेझमध्येच विमानमतळ होणार असल्याची निश्चितता दिसून येत होती.त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासूनचा विमानतळाचा जागेचा प्रश्न मार्गी लागल्याची चर्चा या भागात सुरू झाली. मात्र, शासनाने भागीदारीचा विषय टाळून १५ टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा येथील बाधित शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पुरंदरमध्ये विमानतळाची घोषणा केल्याने शेतकरी विचारात पडलेला आहे.