शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आवक वाढल्याने फळभाज्यांचे भाव स्थिर

By admin | Updated: June 29, 2015 06:28 IST

सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने घाऊक बाजारात फळभाज्यांची मुबलक आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बहुतेक फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले.

पुणे : सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने घाऊक बाजारात फळभाज्यांची मुबलक आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बहुतेक फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले. पाऊस थांबल्याने ग्राहकांकडूनही भाज्यांची मागणी वाढली आहे, असे असले तरी मागणीच्या तुलनेत आवक माफक असल्याने फारशी भाववाढ झालेली नाही.गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली. मागील आठवड्यात पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली होती. रविवारी लसूण व घेवड्याच्या भावात प्रति दहा किलोमागे प्रत्येकी १०० रुपयांची घट झाली. तर तोंडल्याचे भाव १०० रुपयांनी वाढले. हिरवी मिरचीही ५० रुपयांनी उतरली. इतर भाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले.रविवारी परराज्यातून हिमालच प्रदेशातून मटार १ ट्रक, कर्नाटकातून १५ ते १६ ट्रक कोबी, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, इंदौर येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातून ३.५ हजार गोणी लसूण, इंदौर, आग्रा आणि नाशिक परिसरातून ५० ते ५५ ट्रक बटाट्याची आवक झाली. पुणे विभागातून ३०० ते ४०० गोणी सातारी आले, ५.५ ते ६ हजार पेटी टोमॅटो, ८ ते १० टेम्पो कोबी, १३ ते १४ टेम्पो फ्लॉवर, ८२२ ते १० टेम्पो ढोबळी मिरची, २५० गोणी भुईमूग शेंग, ८ ते १० टेम्पो लाल भोपळा, ३ ते ४ टेम्पो हिरवी मिरची, ३० ते ४० गोणी चिंच आणि सुमारे १०० ट्रक कांद्याची आवक झाली.