शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

दीड महिन्यानंतरही टँँकर मिळेना

By admin | Updated: April 29, 2017 04:01 IST

वाढत्या उन्हाच्या झळामुळे तालुक्यातील पाण्याचे झरे, ओढेनाले आटले असून, विहिरींचे पाणी कमी झाल्याने भोर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई

भोर : वाढत्या उन्हाच्या झळामुळे तालुक्यातील पाण्याचे झरे, ओढेनाले आटले असून, विहिरींचे पाणी कमी झाल्याने भोर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई सुरु झाली आहे. भोर पंचायत समितीकडे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर करुन दीड महिना झाल्यानंतर एका टँॅकरला मंजुरी मिळाली आहे. मात्र तो सुरु करण्यात आला नाही. पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून टोलवाटोलवी सुरु आहे. टँकर सुरु करा; अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. भाटघर व नीरा देवघर या दोन्ही धरणभागातील गावांत वीसगाव महुडे खोऱ्यात व महामार्गावरील काही गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. १० गावे व १३ वाड्यावस्त्यांनी टँॅकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले होते. त्यापैकी सर्वच गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी शिरवली हि.मा. व चौधरीवस्ती यांच्यासाठी एका टँॅकरला मंजुरी मिळाली आहे. त्याला आठवडा झाला मात्र टँकर पुरविण्याचे टेंडर मिळालेल्या संस्थेने अद्याप टँकर सुरु केलेला नाही. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे टँॅकर मंजूर होऊनही नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. पाणीटंचाई असलेल्या शिरवली हि.मा. चौधरीवस्ती, मोरवाडीचे पाचलिंगे, म्हसरबुची धनगरवस्ती, भुतोंडे, डेरेची खिळदेववाडी, गृहिणी, गुढे निवंगण, पसुरेची धनगरवस्ती, जयतपाड हुंबेवस्ती, दुर्गाडीची मानटवस्ती, अभेपुरी रायरीची धारांबेवाडी, खुलशी, वरोडी खुर्द, वरोडी बुदुक, वरोडी डायमुख, शिळींब अशिंपीची उंबार्डेवाडी, शिरगावची पातरटाकेवस्ती, डेहेणची जळकेवाडी या १० गावांनी व १३ वाडयावस्त्यांनी टँॅकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीत दीड महिन्यापूर्वीच सादर केले आहेत. महामार्गावरील शिंदेवाडी व ससेवाडी येथे ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.दरम्यान, शिरवली हि.मा, भुतोंडे, पातरटेकवाडी (शिरगाव), गुढे निवंगण, मानटवस्ती (दुर्गाडी), हुंबेवस्ती (जयतपाड), जळकेवाडी (डेहेण), राजीवडी, शिळींब, खिळदेवाडी (डेरे), खुलशी, धनगरवस्ती (म्हसरबु), गृहिणी या गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत. त्यापैकी शिरवली हि.मा. व चौधरीवस्ती या गाव वाडीला एका टँकरला म्ांजुरी मिळाली आहे. त्याला आठवडा होऊनही संस्थेच्या हालगर्जीपणामुळे अद्याप टॅकर सुरु झाला नाही. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँॅकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. (वार्ताहर)