शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

दीड महिन्यानंतरही टँँकर मिळेना

By admin | Updated: April 29, 2017 04:01 IST

वाढत्या उन्हाच्या झळामुळे तालुक्यातील पाण्याचे झरे, ओढेनाले आटले असून, विहिरींचे पाणी कमी झाल्याने भोर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई

भोर : वाढत्या उन्हाच्या झळामुळे तालुक्यातील पाण्याचे झरे, ओढेनाले आटले असून, विहिरींचे पाणी कमी झाल्याने भोर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई सुरु झाली आहे. भोर पंचायत समितीकडे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर करुन दीड महिना झाल्यानंतर एका टँॅकरला मंजुरी मिळाली आहे. मात्र तो सुरु करण्यात आला नाही. पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून टोलवाटोलवी सुरु आहे. टँकर सुरु करा; अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. भाटघर व नीरा देवघर या दोन्ही धरणभागातील गावांत वीसगाव महुडे खोऱ्यात व महामार्गावरील काही गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. १० गावे व १३ वाड्यावस्त्यांनी टँॅकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले होते. त्यापैकी सर्वच गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी शिरवली हि.मा. व चौधरीवस्ती यांच्यासाठी एका टँॅकरला मंजुरी मिळाली आहे. त्याला आठवडा झाला मात्र टँकर पुरविण्याचे टेंडर मिळालेल्या संस्थेने अद्याप टँकर सुरु केलेला नाही. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे टँॅकर मंजूर होऊनही नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. पाणीटंचाई असलेल्या शिरवली हि.मा. चौधरीवस्ती, मोरवाडीचे पाचलिंगे, म्हसरबुची धनगरवस्ती, भुतोंडे, डेरेची खिळदेववाडी, गृहिणी, गुढे निवंगण, पसुरेची धनगरवस्ती, जयतपाड हुंबेवस्ती, दुर्गाडीची मानटवस्ती, अभेपुरी रायरीची धारांबेवाडी, खुलशी, वरोडी खुर्द, वरोडी बुदुक, वरोडी डायमुख, शिळींब अशिंपीची उंबार्डेवाडी, शिरगावची पातरटाकेवस्ती, डेहेणची जळकेवाडी या १० गावांनी व १३ वाडयावस्त्यांनी टँॅकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीत दीड महिन्यापूर्वीच सादर केले आहेत. महामार्गावरील शिंदेवाडी व ससेवाडी येथे ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.दरम्यान, शिरवली हि.मा, भुतोंडे, पातरटेकवाडी (शिरगाव), गुढे निवंगण, मानटवस्ती (दुर्गाडी), हुंबेवस्ती (जयतपाड), जळकेवाडी (डेहेण), राजीवडी, शिळींब, खिळदेवाडी (डेरे), खुलशी, धनगरवस्ती (म्हसरबु), गृहिणी या गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत. त्यापैकी शिरवली हि.मा. व चौधरीवस्ती या गाव वाडीला एका टँकरला म्ांजुरी मिळाली आहे. त्याला आठवडा होऊनही संस्थेच्या हालगर्जीपणामुळे अद्याप टॅकर सुरु झाला नाही. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँॅकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. (वार्ताहर)