शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

श्रीकृष्णानंतर अखंड सावधान छत्रपती शिवरायच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “भगवान श्रीकृष्णानंतर सदैव सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार केलेले नजीकच्या इतिहातील एकमेव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “भगवान श्रीकृष्णानंतर सदैव सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार केलेले नजीकच्या इतिहातील एकमेव व्यक्तिमत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. महाराज हे सर्वांचे असून सर्व भाषांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व समजावून सांगितले गेले पाहिजे,” असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

सारस अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पन्नासाव्या वर्धापनदिन सोहळ्यात पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विद्याधर अनास्कर यांनाही या वेळी गौरविण्यात आले. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते पुरंदरे व अनास्कर या दोघांचा सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश धारप, उपाध्यक्ष दत्तात्रय गोडबोले, संचालक शरद पायगुडे, संतोष दाभाडे, विनायक बेहरे, राजाभाऊ चौधरी (जेजुरी), कार्यकारी संचालिका श्रुती सोमण तसेच माजी संघचालक बापू घाटपांडे, सहकार भारतीचे अध्यक्ष मुकुंदराव तापकीर, विश्वास देशपांडे, राजाभाऊ बराटे, शिवराम मेंगडे, कस्तुरी राणे-पायगुडे, धरणीधर पाटील, ॲड. नंदू फडके आदी उपस्थित होते.

शिवशाहीर पुरंदरे म्हणाले, “शिवचरित्र करमणुकीसाठी नाही तर शिकण्यासाठी असल्याची जाणीव हवी. छत्रपतींना अवघे ५० वर्षांचे आयुष्य लाभले, मला १०० वर्षांचे. पण शंभर वर्षांतही महाराज मला पूर्ण समजले असा दावा मी करू शकत नाही.” “अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या पतसंस्था समाजातील तळागाळातील नागरिकांचा पैसा बँकिंग क्षेत्रात आणण्यात मोठी भूमिका बजावतात. पत नसणाऱ्या लोकांना पत देण्याचे काम पतसंस्था करत असल्याने सरकारने सहकार क्षेत्राला बळकटी दिली पाहिजे,” असे अनास्कर म्हणाले.

चौकट

फोटो ‘जेेेएमएडीट’ला मेल केला आहे.

ओळ : सारस अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व विद्याधर अनास्कर यांचा स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी डावीकडून अनास्कर, गणेश धारप, पुरंदरे, शरद पायगुडे, स्वामी गोविंददेव गिरी व विनायक बेहरे.