शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधीताच्या मृत्युनंतर जवळच्या नातलगांनी मृताचे पाय धुन पाणी केले प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST

शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकाची मर्यादा असे जाहीर केले असतांनाही पुर्व हवेेेलीतील बहुतांश ग्रामपंचायत ...

शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकाची मर्यादा असे जाहीर केले असतांनाही पुर्व हवेेेलीतील बहुतांश ग्रामपंचायत हद्दीत अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी शंभरपेक्षा जास्त लोक हजेरी लावून सरकारच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखवत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पाणी पिण्याच्या प्रकऱणातील रुग्णाच्या अंत्यविधीसाठीही शेकडो लोकसहभागी सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुर्व हवेलीमधील एका मोठ्या रुग्णालयात या रूग्णाचे दोन दिवसापुर्वी कोरोना मुळे निधन झाले. संसर्ग वाढु नये यासाठी मृत व्यक्तीचे शरीर नातेवाईकांच्या ताब्यात न देता नियमांचे पालन करुन सदर व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. परंतू जवळच्या नातेवाईकांनी विनवणी केल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शेवटची आंघोळ घालण्याच्या नावाखाली बाधिताचा मृतदेह तो राहत असलेल्या दाटीवाटीच्या वस्तीत नेला. व त्या ठिकाणी दहापेक्षा जास्त महिला नातेवाईकांनी त्याला आंघोळ घातली. त्यानंतर त्याचे घरातील १०० पेक्षा जास्त नातेवाईकांनी ते पाणी पिण्यास सुरुवात केली. ही बाब एका स्थानिक कार्यकर्त्याच्या लक्षात आली. कोरोनाचा संसर्ग वाढेल यासाठी पाय धुतलेले पाणी पिऊ नये व अंत्यविधीसाठी त्वरीत हलविण्याची विनंती त्याने नातेवाईकांच्याकडे केली. परंतू नातेवाईकांनी त्या कार्यकर्त्याला गप्प केले व पाणी प्राशन केले. सदर प्रकार या कार्यकर्त्याने व्हॉटस्अप ग्रुपवर टाकल्यानंतर उघडकीस आला. या प्रकरणाचा सखोल तपास करुन, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.

कोरोनाची साखळी तुटावी म्हणून शासनाने अंत्यसंस्कार तसेच दशक्रियाविधी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. हा आदेश राज्यात पाळला जात आहे. परंतू याला पुर्व हवेली अपवाद ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. पुर्व हवेली कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पहात असताना बहुतांश गावात अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी कमीत कमी १०० पेक्षा अधिक लोक जमा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वरील दोन्ही कार्यकर्मात सोशल डिस्टन्स अथवा मास्कचा नियम धाब्यावर बसवला जात आहे. पुर्व हवेेेलीतील मोठ्या ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीमध्ये गेले ८ ते १० दिवसांत झालेल्या अंत्यविधी व दशक्रिया विधींमध्ये सहभागींवर नजर टाकल्यास महाराष्ट्र शासनाने फक्त पुर्व हवेलीलाच या नियमांतून सुट दिली की काय ? असा प्रश्न उपस्थित होते आहे.