शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
4
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
5
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
6
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
7
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
8
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
9
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
10
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
11
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
12
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
13
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
14
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
15
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
16
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
17
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
18
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
19
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

परिस्थिती निवळल्यानंतर, दहावीची २०० गुणांची परीक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:10 AM

पुणे : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा, याबाबत केवळ चर्चा सुरू असली, तरी कोरोनामुळे निर्माण झालेली ...

पुणे : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा, याबाबत केवळ चर्चा सुरू असली, तरी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्णपणे निवळल्यानंतर, विद्यार्थ्यांची १०० ते २०० गुणांची परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. तसेच, यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. सीबीएसई बोर्डाने सुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर करण्याचे निश्चित केले. परंतु, राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीकडून केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत काय करायचे, याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, विद्यार्थ्यांकडे इयत्ता दहावीची परीक्षा दिल्याचे काहीतरी प्रमाणपत्र असावे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून सर्व विषयांवर आधारित १०० ते २०० गुणांची एकच परीक्षा घेण्याचा विचार केला जात आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी सद्य:परिस्थितीत परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर सुमारे दोन तासांची बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा घेण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून चाचपणी केली जात आहे. या परीक्षेत मिळालेले गुण हीच विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीची गुणपत्रिका असणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य व माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.

पालकांना उत्सुकता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकालाबाबत काय निर्णय घेणार? याबाबत इयत्ता दहावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक उत्सुक आहेत. सीबीएसई बोर्डाने निकालाबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सुद्धा दहावीच्या निकालाची पद्धती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केले जात आहे.