शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अखेर चासकमान धरणातून पाणी सोडले

By admin | Updated: April 11, 2017 03:43 IST

चासकमान धरणामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाशी, शेतकरी मात्र उपाशी’ या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन धरणातून ३००

चासकमान : चासकमान धरणामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाशी, शेतकरी मात्र उपाशी’ या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन धरणातून ३०० क्युसेक्सने सोमवारी दुपारी दोन वाजता नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कमान, मोहकल, कडधे, वेताळे, चास, दोंदे, राजगुरुनर, वडगावसह १० गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.चासकमान परिसरातील नदीपात्र पाण्याअभावी कोरडे पडले होते. यामुळे नदी परिसरातील पिके पाण्याअभावी धोक्यात आल्याने परिसरातील शेतकरी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करीत होते. नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार आहे. नदीकाठच्या गावांच्या नळपाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. धरणातून पाणी सोडल्याने राजगुरुनगरचा केदारेश्वरचा बंधारा भरणार आहे. चासकमान धरणाजवळील नदीचे पात्र तसेच विहिरी, बंधाऱ्यांनी तळ गाठला होता. यामुळे पाणीप्रश्न गंभीर झाल्याने नेहेरे शिवार, डांगले शिवार, पांगरी, बुट्टेवाडी, दोंदे आदी गावांच्या नळपाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीचा प्रश्न निर्माण झाला होता.