शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

अखेर चासकमान धरणातून पाणी सोडले

By admin | Updated: April 11, 2017 03:43 IST

चासकमान धरणामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाशी, शेतकरी मात्र उपाशी’ या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन धरणातून ३००

चासकमान : चासकमान धरणामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाशी, शेतकरी मात्र उपाशी’ या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन धरणातून ३०० क्युसेक्सने सोमवारी दुपारी दोन वाजता नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कमान, मोहकल, कडधे, वेताळे, चास, दोंदे, राजगुरुनर, वडगावसह १० गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.चासकमान परिसरातील नदीपात्र पाण्याअभावी कोरडे पडले होते. यामुळे नदी परिसरातील पिके पाण्याअभावी धोक्यात आल्याने परिसरातील शेतकरी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करीत होते. नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार आहे. नदीकाठच्या गावांच्या नळपाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. धरणातून पाणी सोडल्याने राजगुरुनगरचा केदारेश्वरचा बंधारा भरणार आहे. चासकमान धरणाजवळील नदीचे पात्र तसेच विहिरी, बंधाऱ्यांनी तळ गाठला होता. यामुळे पाणीप्रश्न गंभीर झाल्याने नेहेरे शिवार, डांगले शिवार, पांगरी, बुट्टेवाडी, दोंदे आदी गावांच्या नळपाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीचा प्रश्न निर्माण झाला होता.