शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पडवी झाले १५ वर्षांनंतर जलमय, जलयुक्त शिवार ठरले वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:15 IST

दौंड तालुक्यातील पडवी गावाला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. पाऊस पडूनही योग्य साठवण यंत्रणा नसल्याने गावक-यांंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.

वरवंड: दौंड तालुक्यातील पडवी गावाला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. पाऊस पडूनही योग्य साठवण यंत्रणा नसल्याने गावक-यांंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, ग्रामस्थांनी एकत्र येत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सर्व ओढ्यांचे आणि तलावांचे खोलीकर केले. जवळपास १५ वर्षानंतर यावर्षीच्या पावसात हे सर्व तलाव आणि आढे ओसंडून वाहू लागले आहे. जिरायती भागात ग्रामस्थांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.मनात ईच्छा असेल तर माणू काहीही करू शकतो ही म्हण पडवी ग्रामस्थांनी यथार्थ साध्य केली आहे. दुष्काळातून गावाला मुक्त करण्यातसाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले. गावातील सर्व ओढे तसेच नाल्यांचे खोलीकरण जलयुक्त शिवार या अभियानाअंगर्तत ग्रामस्थांनी केले. यंदा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पडवी येथील ओढे नाले पाण्याने भरून वाहत आहे. गायकवाड मळा येथील पाझर तलावात पावसामुळे साचलेल्या पाण्याचे पुजन सरपंच राजेंद्र शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र शितोळे,आबा गायकवाड, लहु गायकवाड, संदीप शितोळे, सुरेश गायकवाड, निलेश शितोळे, अतुल गायकवाड, सोमनाथ गायकवाड उपस्थित होते.>पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशीलगायकवाड मळयामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. जवळपास १० ते १५ वर्षांनी गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गावामध्ये एकूण २५ सिमेंट बंधारे व माती नाला ६९ बंधारे असून यासर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. गायकवाड मळ््यामध्ये जानाई शिरसाई माध्यमातून पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार गायकवाड मळ््यातील पाझर तलावामध्ये पाणी मिळण्यासाठी तालुक्याचे आमदार राहुल कुल राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून तो विषय मार्गी लावणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.- राजेंद्र शितोळे, सरपंच