शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

"नीट’ परीक्षा न देता मेडिकलला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:14 IST

पुणे : तमिळनाडू राज्याने नीट परीक्षेशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राने सुध्दा हा निर्णय घ्यावा का? ...

पुणे : तमिळनाडू राज्याने नीट परीक्षेशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राने सुध्दा हा निर्णय घ्यावा का? केंद्राने स्वीकारलेल्या धोरणाच्या विरोधात जाणे योग्य आहे का? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहेत. मात्र, पुढील काळात न्यायालयात हा निर्णय टिकणार नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर एकच ''नीट'' परीक्षा घेतली जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत एकसूत्रता आली आहे. मात्र, नीट परीक्षेमुळे तमिळनाडू राज्यात एका विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा देण्याची आवश्यकता नसल्याचा कायदा केला. परंतु, या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

--------

तमिळनाडू राज्याने घेतलेला निर्णय धक्कादायक असला, तरी वस्तूस्थितीला धरून आहे. सर्वच गोष्टी केंद्रस्थानी आल्या तर त्यातून काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तमिळनाडूने बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल. मात्र, बारावीच्या परीक्षेत व वैद्यकीय प्रवेशात पारदर्शकता असणे गरजेचे आहे.

-हरिश बुटले, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक

-------------------------

केंद्रीय स्तरावर घेतलेल्या निर्णयावर प्रत्येक राज्याने स्वतंत्रपणे निर्णय घेणे उचित नाही. इतरही राज्य असाच निर्णय घेण्याचा विचार करू शकतात.

मात्र,गेल्या काही वर्षांपासून नीट परीक्षेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रवेशाची व्यवस्थित घडी बसली आहे. तमिळनाडू सरकारने घेतलेला हा निर्णय लोकप्रिय असला तरी तो न्यायालयात टिकणारा नाही.

- एन. के. जरग, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

---------------------

बारावीच्या परीक्षेत काही ठिकाणी गैरप्रकार होतात. त्यामुळे बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देणे सयुक्तिक नाही. नीट परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाते. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा गरजेची आहे.

- तन्वी पवार, विद्यार्थी

-------------------------

प्रत्येक विद्यार्थी प्रवेश पूर्व परीक्षांचा वेगळा अभ्यास करतात. त्यामुळे बारावीच्या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देणे चुकीचे ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासूनच वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश द्यायला हवा.

- ओम नवले, विद्यार्थी

------

काय आहे निर्णय ?

तमिळनाडूमध्ये वैद्यकीय प्रवेश नीट परीक्षेच्या आधारे दिले जाणार नाहीत. तर खासगी व शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणांच्या आधारे दिले जातील. त्यात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना ७.५ टक्के प्राधान्य असेल.

----