शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

विद्यार्थ्यांच्या अट्टहासामुळेच रखडले अकरावीचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला. परिणामी दहावीचा निकाल विक्रमी लागला. विद्यार्थ्यांना ...

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला. परिणामी दहावीचा निकाल विक्रमी लागला. विद्यार्थ्यांना ८० ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्यामुळे त्यांच्या अकरावी प्रवेशाच्या अपेक्षा वाढल्या. मात्र, नामांकित महाविद्यालयातील उपलब्ध जागा पहिल्या व दुसऱ्या फेरीतच भरल्या. परिणामी विद्यार्थ्यांनी घराजवळील कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशाचा विचार करणे अपेक्षित आहे. परंतु, विद्यार्थी ठरावीक महाविद्यालयांचेच पसंतीक्रम ऑनलाईन अर्जात भरत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन फेरीतून प्रवेश मिळत नाही, असे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश समितीच्या सदस्यांकडून सांगितले जात आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावीच्या ८८ हजार ८४० जागांवरील प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून केले जाणार आहेत. त्यातील केवळ ३२ हजार २०५ जागांवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन फेऱ्यांमधून प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी एकापेक्षा अधिक विशेष फेऱ्या घ्याव्या लागणार असल्याचे दिसून येत आहे.