शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

आचारसंहितेच्या अंमलबजावणीत प्रशासकीय यंत्रणा ठरली कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:08 IST

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी प्रचारसभा, फेऱ्या, सुरू झाल्या आहे. मात्र, यासाठी ...

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी प्रचारसभा, फेऱ्या, सुरू झाल्या आहे. मात्र, यासाठी काही ठिकाणी परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या अंमजबजावणीमध्ये तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचीच चर्चा सध्या सुरू आहे.

तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक जण नवनवीन कुल्प्त्या लढवतानाही दिसत नाही. पारावर तर सत्ता कोणाची येणार, यावर चर्चा होऊ लागली असून पैजाही लावल्या जात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्स ॲप्, फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहे. त्यामुळे प्रचार तंत्रात बदल केल्याचे प्रकर्षणाने जाणवते. हा प्रचार सुरू असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसल्याचे समोर आले. कोणाकडे मास्क आहे तर कोणाकडे सॅनिटायझर फिजिकल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाल्याचे दिसते.

दुसरीकडे प्रचार सुरू होताच आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रचाराची वेळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत असतानाही काही उमेदवार अथवा कार्यकर्ते रात्री-अपरात्री मतदांराचे दार ठोठावत असल्याने नागरिक पुरते त्रासले आहे. प्रचासभांमधून मतदारांना आमिष देण्याचे प्रकारही घडत आहे. मात्र, याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याचे दिसते. यासंदर्भात कोणी तक्रार केली तर खडबडून जागे झालेले सरकारी अधिकारी व कर्मचारी संबंधित माहिती घेण्यासाठी आटापिटा करताहेत. जेवणावळीला ऊत आला असून सर्वच ढाबे हाऊसफुल्ल झाले आहेत. काही उमेदवारांनी तर थेट शेतात जेवणावळीस सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर फ्लेक्स लावताना, प्रचारफेरी काढताना परवानगी घेणे आवश्यक असतानाही त्याकडेही दुर्लक्ष करत आहे. निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च एक महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.परंतु, अनेकांनी या खर्चाचीच माहिती दिली नाही. एकूणच आचारसंहिता कक्षात तक्रारींचा पाऊस पडत असताना निवारण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

खेड तालुक्याच्या तहसीलदारपदी वैशाली वाघमारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील घडामोडींची त्यांना फारशी माहिती दिसत नाही. त्याचाच फायदा काही अधिकारी व कर्मचारी घेत आहे. आचारसंहितेसंदर्भात बैठक घेणे गरजेचे असतानाही तशी कोणतीही बैठक पार पडली नाही. किंवा निवडणुकीसंदर्भात प्रशासनाने काय तयारी केली आहे. याची माहिती देणे गरजेचे असतानाही तसे काही झाले नाही. त्यामुळे कायार्लयात सर्व काही अलबेल सुरु असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

०९ राजगुरुनगर फेरी