शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रशासन करणार सभेची ठिकाणे निश्चित

By admin | Updated: January 13, 2017 03:48 IST

शहरात मैदानांची अपुरी असलेली संख्या व निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून त्यासाठी एकाच वेळी

पुणे : शहरात मैदानांची अपुरी असलेली संख्या व निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून त्यासाठी एकाच वेळी होणारी मागणी यातून राजकीय कार्यकर्ते व प्रशासनामध्ये अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सभा घेता येऊ शकतील अशा ठिकाणांची यादी जाहीर केली जाणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. त्याचबरोबर प्रमुख रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी असणार नाही असे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील कोणत्या ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घ्यायच्या आहेत त्याची यादी महापालिका आयुक्तांनी सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींकडून मागविल्या आहेत. या ठिकाणांवर सभा घेतल्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही व इतर प्रश्न उद्भवणार नाहीत याची पोलीस प्रशासनाकडून खातरजमा करून घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून सभा घेता येऊ शकतील अशा ठिकाणांची यादी जाहीर केली जाईल. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सभेला परवानगी द्यायची नाही असा धोरणात्मक निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.शहरामध्ये मोठ्या सभांसाठी खूपच कमी मैदाने उपलब्ध आहेत. एकाच वेळी दोनपेक्षा जास्त मोठ्या सभांचे आयोजन करायचे झाल्यास सभेच्या जागांचा मोठा प्रश्न निर्माण होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रामुख्याने कॉर्नरसभावर भर दिला जातो. या सभांसाठी प्रत्येक प्रभागनिहाय सभांची ठिकाणे प्रशासनाला निश्चित करावी लागणार आहेत. या सभांना परवानगी देताना वाहतूककोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. या जागांसंबंधी पोलिसांचा अभिप्राय घेतला जाणार आहे. निवडणुकीत सभांच्या ठिकाणांमुळे गोंधळ होऊ नये, यासाठी हे नियोजन केले जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सभा, पदयात्रा यासाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. सभेसाठी जागा मालकाचे संमतिपत्र, मनपाचा ना हरकत दाखला जोडून अर्ज करावा लागणार आहे. सभेसाठी ध्वनिक्षेपाच्या परवानग्याही घ्याव्या लागणार आहेत. मिरवणुका काढताना एकाच वेळी दोन मिरवणुका, पदयात्रा समोरासमोर येणार नाहीत याचे नियोजन पोलिसांना करावे लागणार आहे, त्यामुळे मिरवणुका काढण्यापूर्वी वेळेत त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांना बिनधास्त लुटता येणार संक्रांतीचे वाणमहापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना केल्या दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या भेटवस्तूंचा खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट होण्याची भीती त्यांना वाटत होती. मात्र निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच त्यांचा निवडणूक खर्चाचा हिशेब द्यावा लागणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २७ जानेवारीनंतर सुरूवात होणार आहे. त्यामुळे इच्छुकांना संक्रांतीचे वाण लुटण्याबरोबरच अर्ज भरेपर्यंतच्या खर्चाचा कोणताच हिशेब द्यावा लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.