शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

प्रशासन-काश्मिरी जनतेत संवादाचा अभाव- डॉ. शाह फैजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 03:57 IST

हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले.

पुणे : मागील काही वर्षांमध्ये काश्मीरमधील परिस्थिती खूप बिघडली आहे. त्यामुळे येथील तरुण द्वेषापोटी हातात शस्त्रे घेत आहेत. तसेच जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारतात संवादाची भूमिका घेतली त्यावेळी काश्मीरमधील वातावरण शांत झाले होते. त्यामुळे हे हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले.डॉ. फैजल म्हणाले, सध्याचे सरकार हे काश्मीर प्रश्नाबाबत अपयशी ठरले आहे, कारण तेथे दररोज रक्त वाहत आहे. त्यामुळे काश्मीरच्या प्रश्नाचे राजकारण करू नये, कारण आजवर तेथे पेटणाऱ्या आगीत तेल ओतण्याचे काम करण्यात येत असून, तसे न करता त्यात पाणी ओतून आग शांत करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण काश्मीरवासीयांना नवी आशा देण्याची गरज आहे. तिथे रोज लोक मरत आहेत. जम्मू-काश्मीर मधील राजकीय परिस्थिती, येथील राजकारण तरुणाईला धरून नाही. मतदानास पात्र असून येथील तरुण निवडणुकीत मतदान करत नाहीत. म्हणून मला तरुणांना सोबत घेऊन योग्य दिशेने राजकारण करायचे आहे. काश्मिरी पंडित माझ्याशी सहमत आहेत.मतदान तरी का करावे...काश्मीर येथील वातावरण अत्यंत चिघळत चालले आहे. कारण तरुणांचे वैधानिक अधिकार हिसकावून घेतले जात आहेत, अशी भावना तरुणांच्या मनात तयार झाली आहे. याचाच परिणाम त्यांचा आता राजकारण्यांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. आपला अधिकारच नाही तर आपण मतदान तरी का करावे, असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत, असे त्यांनी सांगितले.फैजल म्हणाले, या हिंसक वातावरणाला दोन्ही देशांमधील संवादाची भूमिका हा एकच पर्याय उरला आहे. काश्मिरी पंडितांशिवाय, जम्मू-काश्मिरी पंडितांशिवाय जम्मू-काश्मीरची संस्कृती अपूर्ण आहे. तेथील मुलांना मूळ संस्कृतीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळेच काश्मीरची मूळ ओळख कायम ठेवायची असेल तर शांतता प्रस्थापित करुन काश्मिरला बोलाविले पाहिजे. धर्म, प्रदेश, प्रांत यापलीकडे जाऊन काश्मिरचा प्रश्न सोडविला पाहिजे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी