शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

प्रशासन-काश्मिरी जनतेत संवादाचा अभाव- डॉ. शाह फैजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 03:57 IST

हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले.

पुणे : मागील काही वर्षांमध्ये काश्मीरमधील परिस्थिती खूप बिघडली आहे. त्यामुळे येथील तरुण द्वेषापोटी हातात शस्त्रे घेत आहेत. तसेच जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारतात संवादाची भूमिका घेतली त्यावेळी काश्मीरमधील वातावरण शांत झाले होते. त्यामुळे हे हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले.डॉ. फैजल म्हणाले, सध्याचे सरकार हे काश्मीर प्रश्नाबाबत अपयशी ठरले आहे, कारण तेथे दररोज रक्त वाहत आहे. त्यामुळे काश्मीरच्या प्रश्नाचे राजकारण करू नये, कारण आजवर तेथे पेटणाऱ्या आगीत तेल ओतण्याचे काम करण्यात येत असून, तसे न करता त्यात पाणी ओतून आग शांत करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण काश्मीरवासीयांना नवी आशा देण्याची गरज आहे. तिथे रोज लोक मरत आहेत. जम्मू-काश्मीर मधील राजकीय परिस्थिती, येथील राजकारण तरुणाईला धरून नाही. मतदानास पात्र असून येथील तरुण निवडणुकीत मतदान करत नाहीत. म्हणून मला तरुणांना सोबत घेऊन योग्य दिशेने राजकारण करायचे आहे. काश्मिरी पंडित माझ्याशी सहमत आहेत.मतदान तरी का करावे...काश्मीर येथील वातावरण अत्यंत चिघळत चालले आहे. कारण तरुणांचे वैधानिक अधिकार हिसकावून घेतले जात आहेत, अशी भावना तरुणांच्या मनात तयार झाली आहे. याचाच परिणाम त्यांचा आता राजकारण्यांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. आपला अधिकारच नाही तर आपण मतदान तरी का करावे, असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत, असे त्यांनी सांगितले.फैजल म्हणाले, या हिंसक वातावरणाला दोन्ही देशांमधील संवादाची भूमिका हा एकच पर्याय उरला आहे. काश्मिरी पंडितांशिवाय, जम्मू-काश्मिरी पंडितांशिवाय जम्मू-काश्मीरची संस्कृती अपूर्ण आहे. तेथील मुलांना मूळ संस्कृतीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळेच काश्मीरची मूळ ओळख कायम ठेवायची असेल तर शांतता प्रस्थापित करुन काश्मिरला बोलाविले पाहिजे. धर्म, प्रदेश, प्रांत यापलीकडे जाऊन काश्मिरचा प्रश्न सोडविला पाहिजे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी