शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सारथीकडे प्रशासनाची पाठ

By admin | Updated: July 6, 2017 03:12 IST

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मागील काळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०१३-१४ वर्षांमध्ये पालिकेने मिळवलेले

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मागील काळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०१३-१४ वर्षांमध्ये पालिकेने मिळवलेले देश-विदेशातील पुरस्कार हे त्याची साक्ष देतात. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी या आणि इतर अनेक पुरस्कारांत सारथी या सेवेचा मोठा वाटा आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने कार्यान्वित केलेली तसेच सामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेली सारथी योजना कोलमडली आहे.भारत सरकारने गौरवलेली आणि राज्यातील सर्व पालिकांनी दखल घेतलेली सारथी योजना अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच आयुक्तांनी या नागरिक प्रिय योजनेकडे पाठ फिरवल्यामुळे सारथी अखेरच्या घटका मोजत आहे. या सारथी योजनेमध्ये राज्याच्या ‘आपले सरकार’ च्या योजनेप्रमाणे नवीन संशोधन आणि बदल आवश्यक आहेत. नवीन स्वरूपातील सारथी योजनेचे नागरिक वाट पाहत आहेत. सारथीमध्ये नोंदविण्यात आलेल्या तक्रारी ह्या विभागप्रमुख, अभियंता, महापौर आणि आयुक्त यांच्या डेस्क स्क्रीन वर आॅनलाइन रजिस्टर होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संबंधित विभागाने नवीन पोर्टलची निर्मिती करणे गरजेची वाटते. त्याचप्रमाणे दररोज नोंदल्या जाणाऱ्या तक्रारींचे निराकरण होत नाही. त्यामुळे शहरातील अनेक कामे रखडलेली आहेत. दर शनिवारी होणारी संगणक तंत्रज्ञांची बैठकही अनेक महिने झालेली नाही. त्यामुळे महापालिका आणि नागरिकांचे सुद्धा नुकसान होत आहे. देशामध्ये पिंपरी-चिंचवड नगरी ही सारथी योजनेची जननी आहे. तिचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. सारथी हेल्पलाईन अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. सध्या सारथीचा वापर केवळ माहिती मिळवणे व तक्रार नोंदवणे एवढाच होत आहे़ यामध्ये बदल केला पाहिजे त्यात सेवा मिळवणे आणि सहयोग अर्थात सूचना/प्रतिक्रिया मिळविणे याचा समावेश करावा. महाराष्ट्र सरकारने ज्या प्रकारे आपले सरकार पोर्टल विकसित केले त्याला अनुसरून ‘सारथी’मध्ये आवश्यक बदल केले पाहिजे व त्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे, असे प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले.बैठका नाहीत : अधिकाऱ्यांना पडला विसरपूर्वी तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी स्वत: जातीने लक्ष घालून सारथी योजना यशस्वी केली होती. त्या काळात सर्वच अधिकारी काटेकोरपणे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करीत होते. दर मंगळवारी आयुक्त स्वत: सर्व विभाग प्रमुखांबरोबर बैठक घेत असत. त्यामुळे त्याकाळी अल्पावधीतच सारथी योजना लोकप्रिय ठरली. दुर्दैवाने श्रीकर परदेशी यांच्या बदलीनंतर राजीव जाधव आणि दिनेश वाघमारे यांच्या दुर्लक्षामुळे सारथी योजना मरणासन्न अवस्थेत येऊन पोहचली आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. गेले काही महिने दर आठवड्याला होणारी, दर मंगळवारी होणारी बैठक एकदाही संपन्न झाली नाही. त्याचप्रमाणे नागरिकांच्या शेकडो तक्रारीचे अद्याप निराकरण झालेले नाही. माननीय आयुक्तांनी सारथीकडे पाठ फिरवल्यामुळे एकही वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित रहात नाही.