शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर व्यसनींची पिचकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:43 IST

वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता

राहुल गायकवाडपुणे : वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता. वाहनांची संख्याही हळूहळू वाढत होती. हातात रंगाचा डबा घेऊन दुभाजकांना रंग देण्याचं काम दोघे प्रामाणिकपणे करत होते. एक एक दुभाजक ते रंगवत होते आणि काही समाजकंटक पान-गुटखा खाऊन त्या दुभाजकांवर पिचकारी मारत होते. आपल्या मेहनतीवर काही मिनिटांत मारली जाणारी पिचकारी पाहून त्यांचे मन हेलावत होते. दादा करणार तरी काय अन् बोलणार तरी कोणाला... वाईट तर वाटतं; पण आता लोकांना अडवू तर शकत नाही. आपल्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं पाहत पुढे सरकत राहायचं एवढंच आमच्या नशीबात...बंडगार्डन येथे दुभाजकांना रंगकाम करणारे दोन कामगार बाळू गवळी आणि कैलास नलावडे आपली व्यथा मांडत होते.सध्या पुण्यातील बंडगार्डन भागातील दुभाजक रंगवण्याचं काम चालू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात आले होते. त्यांच्या वाहनांचा ताफा विमातळावरून याच ठिकाणावरून गेला. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हे पुण्याचे ब्रीदवाक्य राष्ट्रपतींना खरे वाटावे म्हणून खरंतर हा खटाटोप. परंतु, या रंगकाम कर्मचाºयांच्या मेहनतीवर काही समाजकंटक पाणी फिरवत असल्याचे चित्र आहे. काल निळ्या व पांढºया रंगाने रंगवलेल्या दुभाजकांना काही वाहनचालकांनी आपल्या आवडत्या लाल रंगाने रंगवले होते. हे कर्मचारी रंगकाम करत असतानाच काही वाहनचालक त्यांच्यासमोरच त्यांनी रंगवलेल्या दुभाजकांवर थुंकत होते. हे चित्र पाहण्यापलीकडे दुसरा कुठलाच उपाय त्यांच्याकडे नव्हता. रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत जिवाचं रान करून हे कर्मचारी दुभाजक रंगवतात. दिवसभर राबल्यानंतर अवघे चारशे रुपये त्यांच्या हातात पडतात. परंतु, त्यांनी केलेल्या कामावर पिचकाºया मारलेल्या पाहून या कर्मचाºयांना अत्यंत दु:ख होते. पोटाची खळगी भरण्यासाठीगपगुमान आपले काम करत राहण्याशिवाय यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही.या कर्मचाºयांचे मुकादम सुभाष साळुंखे म्हणाले, सकाळपासून हे कर्मचारी येथे दुभाजक रंगविण्याचे काम करीत आहेत. वाहने वेगात येत असताना जिवाची पर्वा न करता हे कर्मचारी काम करतात. परंतु काही लोक पिचकाºया मारुन यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. एखाद्याला बोललं तर ते आम्हालाच दमदाटी करतात. आता थुंकणाºयांचे तोंड तर बंद करता येत नाही. त्यामुळे सहन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.शहराच्या विविध भागात सारखीच परिस्थिती आहे. दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन थुंकून खराब केले आहे. त्यामुळे मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाआधी स्वच्छ विचार अभियान राबविण्याची गरज असल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.