शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर व्यसनींची पिचकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:43 IST

वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता

राहुल गायकवाडपुणे : वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता. वाहनांची संख्याही हळूहळू वाढत होती. हातात रंगाचा डबा घेऊन दुभाजकांना रंग देण्याचं काम दोघे प्रामाणिकपणे करत होते. एक एक दुभाजक ते रंगवत होते आणि काही समाजकंटक पान-गुटखा खाऊन त्या दुभाजकांवर पिचकारी मारत होते. आपल्या मेहनतीवर काही मिनिटांत मारली जाणारी पिचकारी पाहून त्यांचे मन हेलावत होते. दादा करणार तरी काय अन् बोलणार तरी कोणाला... वाईट तर वाटतं; पण आता लोकांना अडवू तर शकत नाही. आपल्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं पाहत पुढे सरकत राहायचं एवढंच आमच्या नशीबात...बंडगार्डन येथे दुभाजकांना रंगकाम करणारे दोन कामगार बाळू गवळी आणि कैलास नलावडे आपली व्यथा मांडत होते.सध्या पुण्यातील बंडगार्डन भागातील दुभाजक रंगवण्याचं काम चालू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात आले होते. त्यांच्या वाहनांचा ताफा विमातळावरून याच ठिकाणावरून गेला. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हे पुण्याचे ब्रीदवाक्य राष्ट्रपतींना खरे वाटावे म्हणून खरंतर हा खटाटोप. परंतु, या रंगकाम कर्मचाºयांच्या मेहनतीवर काही समाजकंटक पाणी फिरवत असल्याचे चित्र आहे. काल निळ्या व पांढºया रंगाने रंगवलेल्या दुभाजकांना काही वाहनचालकांनी आपल्या आवडत्या लाल रंगाने रंगवले होते. हे कर्मचारी रंगकाम करत असतानाच काही वाहनचालक त्यांच्यासमोरच त्यांनी रंगवलेल्या दुभाजकांवर थुंकत होते. हे चित्र पाहण्यापलीकडे दुसरा कुठलाच उपाय त्यांच्याकडे नव्हता. रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत जिवाचं रान करून हे कर्मचारी दुभाजक रंगवतात. दिवसभर राबल्यानंतर अवघे चारशे रुपये त्यांच्या हातात पडतात. परंतु, त्यांनी केलेल्या कामावर पिचकाºया मारलेल्या पाहून या कर्मचाºयांना अत्यंत दु:ख होते. पोटाची खळगी भरण्यासाठीगपगुमान आपले काम करत राहण्याशिवाय यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही.या कर्मचाºयांचे मुकादम सुभाष साळुंखे म्हणाले, सकाळपासून हे कर्मचारी येथे दुभाजक रंगविण्याचे काम करीत आहेत. वाहने वेगात येत असताना जिवाची पर्वा न करता हे कर्मचारी काम करतात. परंतु काही लोक पिचकाºया मारुन यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. एखाद्याला बोललं तर ते आम्हालाच दमदाटी करतात. आता थुंकणाºयांचे तोंड तर बंद करता येत नाही. त्यामुळे सहन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.शहराच्या विविध भागात सारखीच परिस्थिती आहे. दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन थुंकून खराब केले आहे. त्यामुळे मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाआधी स्वच्छ विचार अभियान राबविण्याची गरज असल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.