शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर व्यसनींची पिचकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:43 IST

वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता

राहुल गायकवाडपुणे : वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता. वाहनांची संख्याही हळूहळू वाढत होती. हातात रंगाचा डबा घेऊन दुभाजकांना रंग देण्याचं काम दोघे प्रामाणिकपणे करत होते. एक एक दुभाजक ते रंगवत होते आणि काही समाजकंटक पान-गुटखा खाऊन त्या दुभाजकांवर पिचकारी मारत होते. आपल्या मेहनतीवर काही मिनिटांत मारली जाणारी पिचकारी पाहून त्यांचे मन हेलावत होते. दादा करणार तरी काय अन् बोलणार तरी कोणाला... वाईट तर वाटतं; पण आता लोकांना अडवू तर शकत नाही. आपल्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं पाहत पुढे सरकत राहायचं एवढंच आमच्या नशीबात...बंडगार्डन येथे दुभाजकांना रंगकाम करणारे दोन कामगार बाळू गवळी आणि कैलास नलावडे आपली व्यथा मांडत होते.सध्या पुण्यातील बंडगार्डन भागातील दुभाजक रंगवण्याचं काम चालू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात आले होते. त्यांच्या वाहनांचा ताफा विमातळावरून याच ठिकाणावरून गेला. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हे पुण्याचे ब्रीदवाक्य राष्ट्रपतींना खरे वाटावे म्हणून खरंतर हा खटाटोप. परंतु, या रंगकाम कर्मचाºयांच्या मेहनतीवर काही समाजकंटक पाणी फिरवत असल्याचे चित्र आहे. काल निळ्या व पांढºया रंगाने रंगवलेल्या दुभाजकांना काही वाहनचालकांनी आपल्या आवडत्या लाल रंगाने रंगवले होते. हे कर्मचारी रंगकाम करत असतानाच काही वाहनचालक त्यांच्यासमोरच त्यांनी रंगवलेल्या दुभाजकांवर थुंकत होते. हे चित्र पाहण्यापलीकडे दुसरा कुठलाच उपाय त्यांच्याकडे नव्हता. रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत जिवाचं रान करून हे कर्मचारी दुभाजक रंगवतात. दिवसभर राबल्यानंतर अवघे चारशे रुपये त्यांच्या हातात पडतात. परंतु, त्यांनी केलेल्या कामावर पिचकाºया मारलेल्या पाहून या कर्मचाºयांना अत्यंत दु:ख होते. पोटाची खळगी भरण्यासाठीगपगुमान आपले काम करत राहण्याशिवाय यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही.या कर्मचाºयांचे मुकादम सुभाष साळुंखे म्हणाले, सकाळपासून हे कर्मचारी येथे दुभाजक रंगविण्याचे काम करीत आहेत. वाहने वेगात येत असताना जिवाची पर्वा न करता हे कर्मचारी काम करतात. परंतु काही लोक पिचकाºया मारुन यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. एखाद्याला बोललं तर ते आम्हालाच दमदाटी करतात. आता थुंकणाºयांचे तोंड तर बंद करता येत नाही. त्यामुळे सहन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.शहराच्या विविध भागात सारखीच परिस्थिती आहे. दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन थुंकून खराब केले आहे. त्यामुळे मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाआधी स्वच्छ विचार अभियान राबविण्याची गरज असल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.