शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

ती २२ गावे पुणे पाटबंधारेला पूर्ववत जोडा

By admin | Updated: October 26, 2016 05:43 IST

इंदापूर तालुक्यातील २२ गावे चासकमान विभागाला जोडण्याचे षडयंत्र हे पूर्वनियोजितच आहे. या २२ गावांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही.

बावडा : इंदापूर तालुक्यातील २२ गावे चासकमान विभागाला जोडण्याचे षडयंत्र हे पूर्वनियोजितच आहे. या २२ गावांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जर येत्या ४ दिवसांत ही २२ गावे पूर्ववत पुणे पाटबंधारे विभागाला जोडण्यात येणारा शासननिर्णय हा नव्याने काढण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पंचायत समितीचे सभापती विलास वाघमोडे, नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिला आहे. मंगळवारी (दि. २५) शहाजीनगर येथे ते बोलत होते. ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाली, या नावाखाली आता लोकप्रतिनिधी शेतकरी वर्गाची दिशाभूल करीत आहेत. जबाबदारी झटकत आहेत. गेल्या दोन वर्षांत २२ गावांमधील शेतीला धरणात पाणी असतानादेखील अपुरे पाणी सोडण्यात आले, मात्र वरच्या भागातील शेतीला मुबलक पाणी मिळाले, हे येथील जनता विसरलेली नाही. अशा प्रकारे २२ गावांमधील शेतकरी हे अडचणीत असताना, ही गावे चासकमान विभागाला जोडून त्रास देऊ नका, असे आवाहन वाघमोडे व पवार यांनी केले. चुकीचा निर्णय येत्या आठवडाभरात न बदलल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब करगळ यांनी सांगितले, की अंथुर्णे १ व २ अशा दोन शाखांना सदर शासननिर्णयात मान्यता देण्यात आली आहे. यामधील १ शाखा पुणे पाटबंधारे विभागाला जोडण्यात आली आहे, तेथे ‘प्रिंटिंग मिस्टेक’ का झाली नाही. २२ गावे चासकमान पाटबंधारे विभागाला जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती लोकप्रतिनिधींना होती. इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र लढा देतच राहणार आहे. या वेळी नीरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, जि.प. सदस्य देवराज जाधव, आबासाहेब शिंगाडे, विठ्ठल पाटील, धनंजय कोरटकर, रणजित रणवरे, शिवाजी शिंदे, दादा घोगरे, शिवाजी हांगे, सतीश अनपट, शंकर घोगरे, राजेंद्र देवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.