शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

ती २२ गावे पुणे पाटबंधारेला पूर्ववत जोडा

By admin | Updated: October 26, 2016 05:43 IST

इंदापूर तालुक्यातील २२ गावे चासकमान विभागाला जोडण्याचे षडयंत्र हे पूर्वनियोजितच आहे. या २२ गावांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही.

बावडा : इंदापूर तालुक्यातील २२ गावे चासकमान विभागाला जोडण्याचे षडयंत्र हे पूर्वनियोजितच आहे. या २२ गावांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जर येत्या ४ दिवसांत ही २२ गावे पूर्ववत पुणे पाटबंधारे विभागाला जोडण्यात येणारा शासननिर्णय हा नव्याने काढण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पंचायत समितीचे सभापती विलास वाघमोडे, नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिला आहे. मंगळवारी (दि. २५) शहाजीनगर येथे ते बोलत होते. ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाली, या नावाखाली आता लोकप्रतिनिधी शेतकरी वर्गाची दिशाभूल करीत आहेत. जबाबदारी झटकत आहेत. गेल्या दोन वर्षांत २२ गावांमधील शेतीला धरणात पाणी असतानादेखील अपुरे पाणी सोडण्यात आले, मात्र वरच्या भागातील शेतीला मुबलक पाणी मिळाले, हे येथील जनता विसरलेली नाही. अशा प्रकारे २२ गावांमधील शेतकरी हे अडचणीत असताना, ही गावे चासकमान विभागाला जोडून त्रास देऊ नका, असे आवाहन वाघमोडे व पवार यांनी केले. चुकीचा निर्णय येत्या आठवडाभरात न बदलल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब करगळ यांनी सांगितले, की अंथुर्णे १ व २ अशा दोन शाखांना सदर शासननिर्णयात मान्यता देण्यात आली आहे. यामधील १ शाखा पुणे पाटबंधारे विभागाला जोडण्यात आली आहे, तेथे ‘प्रिंटिंग मिस्टेक’ का झाली नाही. २२ गावे चासकमान पाटबंधारे विभागाला जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती लोकप्रतिनिधींना होती. इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र लढा देतच राहणार आहे. या वेळी नीरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, जि.प. सदस्य देवराज जाधव, आबासाहेब शिंगाडे, विठ्ठल पाटील, धनंजय कोरटकर, रणजित रणवरे, शिवाजी शिंदे, दादा घोगरे, शिवाजी हांगे, सतीश अनपट, शंकर घोगरे, राजेंद्र देवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.