शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ती २२ गावे पुणे पाटबंधारेला पूर्ववत जोडा

By admin | Updated: October 26, 2016 05:43 IST

इंदापूर तालुक्यातील २२ गावे चासकमान विभागाला जोडण्याचे षडयंत्र हे पूर्वनियोजितच आहे. या २२ गावांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही.

बावडा : इंदापूर तालुक्यातील २२ गावे चासकमान विभागाला जोडण्याचे षडयंत्र हे पूर्वनियोजितच आहे. या २२ गावांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जर येत्या ४ दिवसांत ही २२ गावे पूर्ववत पुणे पाटबंधारे विभागाला जोडण्यात येणारा शासननिर्णय हा नव्याने काढण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पंचायत समितीचे सभापती विलास वाघमोडे, नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिला आहे. मंगळवारी (दि. २५) शहाजीनगर येथे ते बोलत होते. ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाली, या नावाखाली आता लोकप्रतिनिधी शेतकरी वर्गाची दिशाभूल करीत आहेत. जबाबदारी झटकत आहेत. गेल्या दोन वर्षांत २२ गावांमधील शेतीला धरणात पाणी असतानादेखील अपुरे पाणी सोडण्यात आले, मात्र वरच्या भागातील शेतीला मुबलक पाणी मिळाले, हे येथील जनता विसरलेली नाही. अशा प्रकारे २२ गावांमधील शेतकरी हे अडचणीत असताना, ही गावे चासकमान विभागाला जोडून त्रास देऊ नका, असे आवाहन वाघमोडे व पवार यांनी केले. चुकीचा निर्णय येत्या आठवडाभरात न बदलल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब करगळ यांनी सांगितले, की अंथुर्णे १ व २ अशा दोन शाखांना सदर शासननिर्णयात मान्यता देण्यात आली आहे. यामधील १ शाखा पुणे पाटबंधारे विभागाला जोडण्यात आली आहे, तेथे ‘प्रिंटिंग मिस्टेक’ का झाली नाही. २२ गावे चासकमान पाटबंधारे विभागाला जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती लोकप्रतिनिधींना होती. इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र लढा देतच राहणार आहे. या वेळी नीरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, जि.प. सदस्य देवराज जाधव, आबासाहेब शिंगाडे, विठ्ठल पाटील, धनंजय कोरटकर, रणजित रणवरे, शिवाजी शिंदे, दादा घोगरे, शिवाजी हांगे, सतीश अनपट, शंकर घोगरे, राजेंद्र देवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.