शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांवर कारवाई

By admin | Updated: October 6, 2016 03:26 IST

गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई

हडपसर : गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.गाडीतळ चौकात ज्या रिक्षाचालकांकडे बॅच, गणवेश, परवाना नाही आणि वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, अशा ठिकाणी उभ्या केलेल्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई झाली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिक्षाचालकांबरोबर इतरही वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले.हडपसर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस हवालदार आनंद कांबळे, सुनील बोरकर, पोलीस शिपाई दीपक कांबळे आणि महिला पोलीस शिपाई श्यामल सातपुते यांनी १५ रिक्षांवर कारवाई केली. गाडीतळ चौकात तीनआसनी रिक्षाचालकांचे अनधिकृत सात रिक्षातळ असून, त्यातील तीन अनधिकृत आहेत. अधिकृत असलेल्या ठिकाणी तीन-चार रिक्षा उभ्या करण्यासाठी परवानगी आहे; मात्र तेथे १० ते १५ रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. अशा रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नियम पाळा, अपघात टाळा४झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉपलाइनवर थांबा व पादचाऱ्यांचा आदर करा, लाल दिवा लागल्यानंतर थांबा, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे टाळा, सिटबेल्ट, हेल्मेटचा वापर करा आणि अ‍ॅम्ब्युलन्सला प्राधान्याने रस्ता मोकाळा करून द्या असे साधे नियम वाहन चालविताना पाळून आणि संयम ठेवून पुण्याच्या संस्कृतीची ओळख वाढवू या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.गाडीतळ मध्यवर्ती ठिकाण४हडपसरगाव आणि परिसरातील नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी प्रमुख ठिकाण म्हणून गाडीतळ ओळखले जाते. पूर्र्वी या ठिकाणी बैलगाड्या थांबत होत्या त्यावरून या ठिकाणाला गाडीतळ असे नाव पडले आहे. त्यानंतर या ठिकाणी जकात नाका सुरू केला होता. आता या ठिकाणी पीएमपीचा बसथांबा आणि पोलीस ठाणे आहे.उड्डाणपुलाचे नियोजन चुकले४गाडीतळावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे नियोजन केले. सुरुवातीला आकाशवाणी ते वैदूवाडी चौकदरम्यान पाच किलोमीटर लांबीचा आणि सासवडकडे एल, तसेच मगरपट्टा चौकातही एल अशी रचना होती. मात्र, हा पूल अवघा ९०० मीटर झाला आणि वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनली. त्यानंतर मगरपट्टा चौकात आणि गाडीतळावर उड्डाणपुलावर दोन पूल उभारले. मात्र, अद्यापही गाडीतळावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.