शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

रिक्षाचालकांवर कारवाई

By admin | Updated: October 6, 2016 03:26 IST

गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई

हडपसर : गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.गाडीतळ चौकात ज्या रिक्षाचालकांकडे बॅच, गणवेश, परवाना नाही आणि वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, अशा ठिकाणी उभ्या केलेल्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई झाली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिक्षाचालकांबरोबर इतरही वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले.हडपसर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस हवालदार आनंद कांबळे, सुनील बोरकर, पोलीस शिपाई दीपक कांबळे आणि महिला पोलीस शिपाई श्यामल सातपुते यांनी १५ रिक्षांवर कारवाई केली. गाडीतळ चौकात तीनआसनी रिक्षाचालकांचे अनधिकृत सात रिक्षातळ असून, त्यातील तीन अनधिकृत आहेत. अधिकृत असलेल्या ठिकाणी तीन-चार रिक्षा उभ्या करण्यासाठी परवानगी आहे; मात्र तेथे १० ते १५ रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. अशा रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नियम पाळा, अपघात टाळा४झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉपलाइनवर थांबा व पादचाऱ्यांचा आदर करा, लाल दिवा लागल्यानंतर थांबा, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे टाळा, सिटबेल्ट, हेल्मेटचा वापर करा आणि अ‍ॅम्ब्युलन्सला प्राधान्याने रस्ता मोकाळा करून द्या असे साधे नियम वाहन चालविताना पाळून आणि संयम ठेवून पुण्याच्या संस्कृतीची ओळख वाढवू या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.गाडीतळ मध्यवर्ती ठिकाण४हडपसरगाव आणि परिसरातील नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी प्रमुख ठिकाण म्हणून गाडीतळ ओळखले जाते. पूर्र्वी या ठिकाणी बैलगाड्या थांबत होत्या त्यावरून या ठिकाणाला गाडीतळ असे नाव पडले आहे. त्यानंतर या ठिकाणी जकात नाका सुरू केला होता. आता या ठिकाणी पीएमपीचा बसथांबा आणि पोलीस ठाणे आहे.उड्डाणपुलाचे नियोजन चुकले४गाडीतळावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे नियोजन केले. सुरुवातीला आकाशवाणी ते वैदूवाडी चौकदरम्यान पाच किलोमीटर लांबीचा आणि सासवडकडे एल, तसेच मगरपट्टा चौकातही एल अशी रचना होती. मात्र, हा पूल अवघा ९०० मीटर झाला आणि वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनली. त्यानंतर मगरपट्टा चौकात आणि गाडीतळावर उड्डाणपुलावर दोन पूल उभारले. मात्र, अद्यापही गाडीतळावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.