शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

रिक्षाचालकांवर कारवाई

By admin | Updated: October 6, 2016 03:26 IST

गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई

हडपसर : गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.गाडीतळ चौकात ज्या रिक्षाचालकांकडे बॅच, गणवेश, परवाना नाही आणि वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, अशा ठिकाणी उभ्या केलेल्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई झाली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिक्षाचालकांबरोबर इतरही वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले.हडपसर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस हवालदार आनंद कांबळे, सुनील बोरकर, पोलीस शिपाई दीपक कांबळे आणि महिला पोलीस शिपाई श्यामल सातपुते यांनी १५ रिक्षांवर कारवाई केली. गाडीतळ चौकात तीनआसनी रिक्षाचालकांचे अनधिकृत सात रिक्षातळ असून, त्यातील तीन अनधिकृत आहेत. अधिकृत असलेल्या ठिकाणी तीन-चार रिक्षा उभ्या करण्यासाठी परवानगी आहे; मात्र तेथे १० ते १५ रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. अशा रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नियम पाळा, अपघात टाळा४झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉपलाइनवर थांबा व पादचाऱ्यांचा आदर करा, लाल दिवा लागल्यानंतर थांबा, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे टाळा, सिटबेल्ट, हेल्मेटचा वापर करा आणि अ‍ॅम्ब्युलन्सला प्राधान्याने रस्ता मोकाळा करून द्या असे साधे नियम वाहन चालविताना पाळून आणि संयम ठेवून पुण्याच्या संस्कृतीची ओळख वाढवू या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.गाडीतळ मध्यवर्ती ठिकाण४हडपसरगाव आणि परिसरातील नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी प्रमुख ठिकाण म्हणून गाडीतळ ओळखले जाते. पूर्र्वी या ठिकाणी बैलगाड्या थांबत होत्या त्यावरून या ठिकाणाला गाडीतळ असे नाव पडले आहे. त्यानंतर या ठिकाणी जकात नाका सुरू केला होता. आता या ठिकाणी पीएमपीचा बसथांबा आणि पोलीस ठाणे आहे.उड्डाणपुलाचे नियोजन चुकले४गाडीतळावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे नियोजन केले. सुरुवातीला आकाशवाणी ते वैदूवाडी चौकदरम्यान पाच किलोमीटर लांबीचा आणि सासवडकडे एल, तसेच मगरपट्टा चौकातही एल अशी रचना होती. मात्र, हा पूल अवघा ९०० मीटर झाला आणि वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनली. त्यानंतर मगरपट्टा चौकात आणि गाडीतळावर उड्डाणपुलावर दोन पूल उभारले. मात्र, अद्यापही गाडीतळावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.