शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

रिक्षाचालकांवर कारवाई

By admin | Updated: June 28, 2017 04:22 IST

लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यास किंवा रात्रीच्या वेळेस प्रवासी घेण्यास नकार देणाऱ्या अथवा ज्यादा भाड्याची मागणी करणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यास किंवा रात्रीच्या वेळेस प्रवासी घेण्यास नकार देणाऱ्या अथवा ज्यादा भाड्याची मागणी करणाऱ्या काही मुजोर रिक्षाचालकांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, अशा प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, तब्बल २२७ रिक्षाचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला सूचित करण्यात आले आहे. रिक्षाला हात केल्यानंतर चालकाकडून कुठे जाणार? अशी विचारणा होते. पण अमुक एक ठिकाण सांगितल्यावर रिक्षाचालकांकडून हमखास नकार ऐकायला मिळतो. रात्रीच्या वेळेस बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात हा अनुभव प्रत्येक प्रवाशाला येतोच. मात्र रिक्षाचालकांचा हा मुजोरपणा सहन करण्याशिवाय प्रवाशांसमोर पर्याय नसतो. यासंदर्भात काही प्रवाशांनी वाहतूक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर पालखीचे पुण्यात आगमन होण्यापूर्वी दहा दिवस शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम राबविली. साध्या वेशातील कर्मचाऱ्यांनीच डमी प्रवासी म्हणून रिक्षाचालकांकडे विचारणा केली. प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना पोलीस चौकीमध्ये आणण्यात आले.