शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

टीकेपेक्षा कृतीची आवश्यकता

By admin | Updated: March 31, 2017 02:59 IST

‘पिंपरी-चिंचवडकरांचे पाप इंद्रायणी नदीत’ वाहत असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आळंदीमध्ये केले

पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवडकरांचे पाप इंद्रायणी नदीत’ वाहत असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आळंदीमध्ये केले. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. ज्या पिंपरी-चिंचवडकरांनी पालिका ते पार्लमेंट अशी सत्ता भाजपाला दिली, त्यांच्याविषयी असे बोलणे चुकीचे असल्याचा आक्षेप विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी शब्द मागे घेण्याची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या नदी प्रदूषणावर मुख्यमंत्र्यांनी बोलण्याअगोदर निधीअभावी लालफितीत अडकलेल्या नदीसुधार प्रकल्पाला आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा नदी प्रदूषणावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना नैतिक अधिकार नाही, अशा प्रतिक्रिया दिली आहे. नदी प्रदूषणावर टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्री यांनी तोडगा काढावा, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.(प्रतिनिधी)ज्या पिंपरी-चिंचवडकरांनी सत्ता दिली त्यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. हा सामान्य लोकांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांना नदी प्रदूषणावरच बोलायचे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. कारण पिंपरी-चिंचवडकरांसाठी आवश्यक असणाऱ्या नदीसुधार प्रकल्पाला लालफितीत अडकवून ठेवले आहे. आता भाजपाची सत्ता आहे, तर मुख्यमंत्र्यांनी नदीसुधार प्रकल्पाला निधी द्यावा. तसेच पिंपरी-चिंचवडकरांबद्दल केलेले विधान मागे घ्यावे. - संजोग वाघेरे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)मुख्यमंत्र्यांनी जी शब्दयोजना केली, ती आक्षेपार्ह आहे. ‘पिंपरी-चिंचवडकरांचे पाप’ असे बोलणे संयुक्तिक नाही. नदीप्रदूषण होत आहे, याबाबत आम्ही सर्वजण सहमत आहोत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ टीका न करता यावर कृती करणे अपेक्षित आहे. आळंदी नगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या नदी प्रदूषणावर तोडगा काढावा. - सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवडकरांचे पाप काढत बसण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर दिला पाहिजे. पिंपरी-चिंचवडकरांनी पालिका ते पार्लमेंट अशी सत्ता भाजपाला दिली आहे. त्या जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. नदीतील प्रदूषण पिंपरी-चिंचवडकरांचे पाप वाटत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी नदीसुधार प्रकल्पाला निधी उपलब्ध करून द्यावा. - राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांबद्दल रोष व्यक्त केला आहे. हे करीत असताना मुख्यमंत्र्यांनी जपून विधान करणे गरजेचे होते. अशा विधानामुळे सामान्य नागरिकांचा अवमान झाला आहे. आळंदीची दुर्दशा होण्यास भाजपाचेच सरकार जबाबदार आहे. अर्थसंकल्पात इंद्रायणी नदीसुधारसाठी भरीव तरतूद गरजेची असताना तसे झाले नाही. अशा विधानांमधून राज्य सरकारचे अपयश लपवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे.- मानव कांबळे, अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समितीइंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला शहरातील प्रदूषकेच कारणीभूत आहेत. महापालिके ने तयार केलेल्या नदीसुधार प्रकल्पात प्रदूषण कमी करण्यासंबंधी ठोस उपाययोजनाच नाही. या प्रकल्पात केवळ सुशोभीकरणावर भर दिला गेला आहे. म्हणूनच या प्रकल्पाला निधी मिळणे कठीण झाले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने नदीसुधार प्रकल्पाच्या निधीची वाट न पाहता सतत कार्यशील राहिले पाहिजे. - विकास पाटील, अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती