शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

कारवाईपूर्वी रिक्षाचालकांचे ऐकून घ्या, वेशांतर करून पोलिसांची रिक्षाचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:49 IST

पुणे : वेशांतर केलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचा-यांकडून रिक्षाचालकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे.

पुणे : वेशांतर केलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचा-यांकडून रिक्षाचालकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. रिक्षाचालकांनी भाडे नाकारलेले नसताना पोलीस त्यांची बाजू ऐकून न घेताच त्यांचा वाहतूक परवाना जप्त करत आहेत. मात्र, वाहतूक परवाना जप्त करून रद्द करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आहेत. त्यामुळे आरटीओने रिक्षाचालकांना बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी विविध रिक्षा संघटनांच्या वतीने केली जात आहे.शहरातील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना चांगली वागणूक दिली जात नाही, त्यांच्याकडून मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही, अशा तक्रारी आरटीओ कार्यालयाकडे केल्या जातात. मात्र, सर्वच रिक्षा चालकांकडून प्रवाशांची फसवणूक केली जात नाही. अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. त्यामुळे रिक्षाचालकांवर विनाकारण कारवाई करू नये, अशी अपेक्षा रिक्षाचालक संघटनांकडून केली जाते. त्यात, गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस विभागाच्या कर्मचाºयांनी वेशांतर करून रिक्षाचालकांवर भाडे नाकारत असल्याचे कारण दाखवून कारवाई केली जात आहे. याबाबत वाहतूक पोलीस विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. मंगळवारी आणखी काही रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आल्याने त्यांनी आरटीओ कार्यालयाकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे. रिक्षा पंचायतीचे पदाधिकारी नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्याशी याबाबत चर्चा केली.पुण्यात कोणतेही मोठे गुन्हे घडत नाहीत. त्यामुळेच वाहतूक पोलीस विभागाने वेशांतर केलेल्या पोलिसांकडून भाडे नाकारणाºया रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे का? असा सवाल नितीन पवार यांनी उपस्थित केला. तसेच पोलीस कर्मचाºयांना ठराविक दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. त्यामुळेच कोणतीही चूक नसताना रिक्षाचालकांकडून बळजबरीने हा दंड वसूल केला जात आहे. त्यांना स्वत:ची बाजू मांडण्याची संधीही दिली जात नाही. पोलिसांकडून संबंधित चालकाचा वाहतूक परवाना जप्त केला जातो.>अंदाज घेऊन सांगितले जाते भाडेमहिला पोलीस कर्मचारी साधा पोशाख परिधान करून रिक्षामध्ये बसतात. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किती पैसे लागणार, अशी विचारणा करतात. मीटरप्रमाणे पैसे होतील, असे सांगितल्यानंतरही अंदाजे रक्कम विचारली जाते. मीटरप्रमाणेच पैसे होतील, असे वारंवार सांगूनही सतत रक्कम विचारतात. निश्चित ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ आणि किलोमीटर यांचा अंदाज घेऊन रिक्षाचालक रक्कम सांगतात. त्यानंतर त्वरित त्याच्यावर भाडे नाकारल्याबद्दल कारवाई केली जाते.- मनोज पिल्ले, माजी अध्यक्ष भीमशक्ती रिक्षा संघटना