शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयाचा ‘रियाज’ आवश्यक : गिरीश कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:09 IST

पुणे : हल्ली चार- पाच पोरं एकत्र येतात, काहीतरी वाजवतात. माध्यमांनी त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची व्यवस्था केलेली ...

पुणे : हल्ली चार- पाच पोरं एकत्र येतात, काहीतरी वाजवतात. माध्यमांनी त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची व्यवस्था केलेली असतेच. पण या पद्धतीने खरंच संगीतकार होता येतं का? हा प्रश्न पडायला हवा. अभिनयाला देखील ही गोष्ट लागू होते. सध्याची तरूण मुले अभिनयाचे कचकड्याचे शिक्षण घेत आहेत. ‘अभिनय’ शिकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यासाठी रियाज अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला अभिनेते, दिग्दशर्क गिरीश कुलकर्णी यांनी तरूण रंगकर्मींना दिला.

एरंडवणे येथील ‘द बॉक्स’ नाट्यगृहामध्ये आयोजित ‘थिएटर आॅन’ महोत्सवात रविवारी (दि.27) कुलकर्णी यांच्या गप्पांचा कार्यक्रम रंगला. अभिनेता क्षितीज दाते याने त्यांच्याशी संवाद साधला.

आज उठसूठ अभिनेता बनण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला जातो. मात्र मुंबईत कलाकार बाजूला राहातो आणि कलाकाराची जगण्याचीच एकप्रकारे लढाई सुरू होते. मग पडेल ते काम करावे लागते. अभिनेता म्हणून कामे मिळाली नाही तरी चालतील, तुमच्यात ती आंतरिक ऊर्जा आणि क्षमता असेल तर कामे आपोआप मिळत राहातील. पण त्यासाठी रियाज पक्का आहेत? का? कलाकार म्हणून स्वत:कडून अपेक्षा काय आहेत? भूमिकेचा अभ्यास केला जातो का? व्यक्तिचित्रे मनात रेखाटून त्यात समरस होण्यासाठी प्रयत्न केला जातोय का? असे प्रश्न पडायला हवेत, असे कुलकर्णी म्हणाले.

दरम्यान, महोत्सवामध्ये रविवारी (दि.27) सकाळी लहान मुलांसाठी कार्यशाळा तर सायंकाळी रित्विका श्रोत्री लिखित आणि कौमुदी वलोकर दिग्दर्शित ‘तहकूब’ नाटकाचे सादरीकरण, क्षितीज दाते याचा मँजिक शो आदी कार्यक्रम रंगले. विराजस कुलकर्णी लिखित आणि सूरज पारसनीस दिग्दर्शित ‘मिकी’ या मराठी नाट्याने महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवाला स्वीच बाईक, कार साथी, बेल्ज केक, वैष्णवी भेळ यांचे प्रायोजकत्व लाभले. ‘लोकमत’ या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक होता.

-------------------------------------------

...हे नाकारणं कलाकाराला कठीण झालं आहे.

कलाकार हा एक सामान्य माणूस आहे. पण त्यांना डोक्यावर बसवले जाते. मग त्यांनी भूमिका घेणं अधिक दुर्धर होते. त्यांनी बोललं की माध्यमं मागे धावणार. मग ते राजकीयदृष्ट्या अचूक राहाण्याचा प्रयत्न करणार. असे पासरीभर नट आसपास आहेत. त्यातून व्यवहारचतुर राहाता येते. प्रस्थापित होता येते अशी व्यवधाने आहेत. हे नाकारणं कठीण झालं आहे, असे कलाकारांच्या वर्तुणुकीमागचे भीषण वास्तव गिरीश कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.

---------------------------------------------------------------------