शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयाचा ‘रियाज’ आवश्यक : गिरीश कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:09 IST

पुणे : हल्ली चार- पाच पोरं एकत्र येतात, काहीतरी वाजवतात. माध्यमांनी त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची व्यवस्था केलेली ...

पुणे : हल्ली चार- पाच पोरं एकत्र येतात, काहीतरी वाजवतात. माध्यमांनी त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची व्यवस्था केलेली असतेच. पण या पद्धतीने खरंच संगीतकार होता येतं का? हा प्रश्न पडायला हवा. अभिनयाला देखील ही गोष्ट लागू होते. सध्याची तरूण मुले अभिनयाचे कचकड्याचे शिक्षण घेत आहेत. ‘अभिनय’ शिकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यासाठी रियाज अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला अभिनेते, दिग्दशर्क गिरीश कुलकर्णी यांनी तरूण रंगकर्मींना दिला.

एरंडवणे येथील ‘द बॉक्स’ नाट्यगृहामध्ये आयोजित ‘थिएटर आॅन’ महोत्सवात रविवारी (दि.27) कुलकर्णी यांच्या गप्पांचा कार्यक्रम रंगला. अभिनेता क्षितीज दाते याने त्यांच्याशी संवाद साधला.

आज उठसूठ अभिनेता बनण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला जातो. मात्र मुंबईत कलाकार बाजूला राहातो आणि कलाकाराची जगण्याचीच एकप्रकारे लढाई सुरू होते. मग पडेल ते काम करावे लागते. अभिनेता म्हणून कामे मिळाली नाही तरी चालतील, तुमच्यात ती आंतरिक ऊर्जा आणि क्षमता असेल तर कामे आपोआप मिळत राहातील. पण त्यासाठी रियाज पक्का आहेत? का? कलाकार म्हणून स्वत:कडून अपेक्षा काय आहेत? भूमिकेचा अभ्यास केला जातो का? व्यक्तिचित्रे मनात रेखाटून त्यात समरस होण्यासाठी प्रयत्न केला जातोय का? असे प्रश्न पडायला हवेत, असे कुलकर्णी म्हणाले.

दरम्यान, महोत्सवामध्ये रविवारी (दि.27) सकाळी लहान मुलांसाठी कार्यशाळा तर सायंकाळी रित्विका श्रोत्री लिखित आणि कौमुदी वलोकर दिग्दर्शित ‘तहकूब’ नाटकाचे सादरीकरण, क्षितीज दाते याचा मँजिक शो आदी कार्यक्रम रंगले. विराजस कुलकर्णी लिखित आणि सूरज पारसनीस दिग्दर्शित ‘मिकी’ या मराठी नाट्याने महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवाला स्वीच बाईक, कार साथी, बेल्ज केक, वैष्णवी भेळ यांचे प्रायोजकत्व लाभले. ‘लोकमत’ या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक होता.

-------------------------------------------

...हे नाकारणं कलाकाराला कठीण झालं आहे.

कलाकार हा एक सामान्य माणूस आहे. पण त्यांना डोक्यावर बसवले जाते. मग त्यांनी भूमिका घेणं अधिक दुर्धर होते. त्यांनी बोललं की माध्यमं मागे धावणार. मग ते राजकीयदृष्ट्या अचूक राहाण्याचा प्रयत्न करणार. असे पासरीभर नट आसपास आहेत. त्यातून व्यवहारचतुर राहाता येते. प्रस्थापित होता येते अशी व्यवधाने आहेत. हे नाकारणं कठीण झालं आहे, असे कलाकारांच्या वर्तुणुकीमागचे भीषण वास्तव गिरीश कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.

---------------------------------------------------------------------