शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अभिनयाचा ‘रियाज’ आवश्यक : गिरीश कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:09 IST

पुणे : हल्ली चार- पाच पोरं एकत्र येतात, काहीतरी वाजवतात. माध्यमांनी त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची व्यवस्था केलेली ...

पुणे : हल्ली चार- पाच पोरं एकत्र येतात, काहीतरी वाजवतात. माध्यमांनी त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची व्यवस्था केलेली असतेच. पण या पद्धतीने खरंच संगीतकार होता येतं का? हा प्रश्न पडायला हवा. अभिनयाला देखील ही गोष्ट लागू होते. सध्याची तरूण मुले अभिनयाचे कचकड्याचे शिक्षण घेत आहेत. ‘अभिनय’ शिकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यासाठी रियाज अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला अभिनेते, दिग्दशर्क गिरीश कुलकर्णी यांनी तरूण रंगकर्मींना दिला.

एरंडवणे येथील ‘द बॉक्स’ नाट्यगृहामध्ये आयोजित ‘थिएटर आॅन’ महोत्सवात रविवारी (दि.27) कुलकर्णी यांच्या गप्पांचा कार्यक्रम रंगला. अभिनेता क्षितीज दाते याने त्यांच्याशी संवाद साधला.

आज उठसूठ अभिनेता बनण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला जातो. मात्र मुंबईत कलाकार बाजूला राहातो आणि कलाकाराची जगण्याचीच एकप्रकारे लढाई सुरू होते. मग पडेल ते काम करावे लागते. अभिनेता म्हणून कामे मिळाली नाही तरी चालतील, तुमच्यात ती आंतरिक ऊर्जा आणि क्षमता असेल तर कामे आपोआप मिळत राहातील. पण त्यासाठी रियाज पक्का आहेत? का? कलाकार म्हणून स्वत:कडून अपेक्षा काय आहेत? भूमिकेचा अभ्यास केला जातो का? व्यक्तिचित्रे मनात रेखाटून त्यात समरस होण्यासाठी प्रयत्न केला जातोय का? असे प्रश्न पडायला हवेत, असे कुलकर्णी म्हणाले.

दरम्यान, महोत्सवामध्ये रविवारी (दि.27) सकाळी लहान मुलांसाठी कार्यशाळा तर सायंकाळी रित्विका श्रोत्री लिखित आणि कौमुदी वलोकर दिग्दर्शित ‘तहकूब’ नाटकाचे सादरीकरण, क्षितीज दाते याचा मँजिक शो आदी कार्यक्रम रंगले. विराजस कुलकर्णी लिखित आणि सूरज पारसनीस दिग्दर्शित ‘मिकी’ या मराठी नाट्याने महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवाला स्वीच बाईक, कार साथी, बेल्ज केक, वैष्णवी भेळ यांचे प्रायोजकत्व लाभले. ‘लोकमत’ या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक होता.

-------------------------------------------

...हे नाकारणं कलाकाराला कठीण झालं आहे.

कलाकार हा एक सामान्य माणूस आहे. पण त्यांना डोक्यावर बसवले जाते. मग त्यांनी भूमिका घेणं अधिक दुर्धर होते. त्यांनी बोललं की माध्यमं मागे धावणार. मग ते राजकीयदृष्ट्या अचूक राहाण्याचा प्रयत्न करणार. असे पासरीभर नट आसपास आहेत. त्यातून व्यवहारचतुर राहाता येते. प्रस्थापित होता येते अशी व्यवधाने आहेत. हे नाकारणं कठीण झालं आहे, असे कलाकारांच्या वर्तुणुकीमागचे भीषण वास्तव गिरीश कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.

---------------------------------------------------------------------