शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

दौंड तालुक्याला टंचाईचे ग्रहण

By admin | Updated: October 2, 2015 01:03 IST

पावसाने मारलेली दडी, तसेच बंद पडलेल्या पाणी योजना यामुळे दौंड तालुक्यातील अनेक गावांत नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे

पावसाने मारलेली दडी, तसेच बंद पडलेल्या पाणी योजना यामुळे दौंड तालुक्यातील अनेक गावांत नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही योजना बंद आहेत. यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. राहू : येथील माटोबा नळपाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्यामुळे या भागातील रहिवाशांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सहा वर्षांपूर्वी या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आले. परंतु अजूनही ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळू शकले नाही. या योजनेवर जवळपास ६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. काम अपूर्ण असताना ही योजना कशी सुरू झाली, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या योजनेंतर्गत काही भागात आठवड्यातून जेमतेम दोन ते तीन वेळा पाणी मिळते. मात्र, काही ठिकाणी तेवढेही पाणी नागरिकांच्या नशिबी नाही. ही योजना तारक की मारक, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यावसायिकांनी चक्क पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पाणी दूषित मिळत असल्याने नागरिकांनाही पाणी विकत घ्यावे लागत आहे. याचा भुर्दंड ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. पाणी मिळत नसतानाही ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी वसूल केली जात आहे. माटोबा नळपाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. आणि हे समितीचे अध्यक्ष पांडुरंग सोनवणे मान्य करीत नाहीत. ग्रामसभेतदेखील या योजनेविषयी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर या योजनेत घोटाळा झाला असल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. योजनेच्या ठेकेदाराला वेळोवेळी ग्रामसभेत उपस्थित राहण्याच्या सूचना देखील केल्या. मात्र संबंधित ठेकेदार ग्रामसभेला उपस्थित राहात नाही. (वार्ताहर)नानगावची २0 वर्षांपूर्वीची पाणीपुरवठा योजना बंदकेडगाव : नानगाव (ता. दौंड) येथील २० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाल्याने ही योजना बंद आहे. नानगाव हे भीमा नदी काठावर वसलेले आहे. या गावाला क्षारयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने समस्येला सामोरे जावे लागत होते. २० वर्षांपूर्वी पाणी योजना करण्यात आली. मात्र, या योजनेचे काम निकृष्ट झाल्याने नागरिकांना आजही क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. या योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ नानासाहेब रणदिवे यांनी उपोषणदेखील केले होते. परंतु, तात्पुरते आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले.ग्रामस्थांना शुद्ध पाणी त्वरित मिळण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी सरपंच विश्वास भोसले यांनी केली. तत्कालीन आमदार रमेश थोरात, तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून, तसेच पुणे महानगरपालिकेने ग्रामस्थांसाठी १० लाख रुपये खर्च करून जलशुद्धीकरण योजना उभारली आहे. त्यानुसार अल्पदरात या योजनेंतर्गत ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.