शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

दौंड तालुक्याला टंचाईचे ग्रहण

By admin | Updated: October 2, 2015 01:03 IST

पावसाने मारलेली दडी, तसेच बंद पडलेल्या पाणी योजना यामुळे दौंड तालुक्यातील अनेक गावांत नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे

पावसाने मारलेली दडी, तसेच बंद पडलेल्या पाणी योजना यामुळे दौंड तालुक्यातील अनेक गावांत नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही योजना बंद आहेत. यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. राहू : येथील माटोबा नळपाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्यामुळे या भागातील रहिवाशांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सहा वर्षांपूर्वी या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आले. परंतु अजूनही ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळू शकले नाही. या योजनेवर जवळपास ६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. काम अपूर्ण असताना ही योजना कशी सुरू झाली, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या योजनेंतर्गत काही भागात आठवड्यातून जेमतेम दोन ते तीन वेळा पाणी मिळते. मात्र, काही ठिकाणी तेवढेही पाणी नागरिकांच्या नशिबी नाही. ही योजना तारक की मारक, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यावसायिकांनी चक्क पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पाणी दूषित मिळत असल्याने नागरिकांनाही पाणी विकत घ्यावे लागत आहे. याचा भुर्दंड ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. पाणी मिळत नसतानाही ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी वसूल केली जात आहे. माटोबा नळपाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. आणि हे समितीचे अध्यक्ष पांडुरंग सोनवणे मान्य करीत नाहीत. ग्रामसभेतदेखील या योजनेविषयी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर या योजनेत घोटाळा झाला असल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. योजनेच्या ठेकेदाराला वेळोवेळी ग्रामसभेत उपस्थित राहण्याच्या सूचना देखील केल्या. मात्र संबंधित ठेकेदार ग्रामसभेला उपस्थित राहात नाही. (वार्ताहर)नानगावची २0 वर्षांपूर्वीची पाणीपुरवठा योजना बंदकेडगाव : नानगाव (ता. दौंड) येथील २० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाल्याने ही योजना बंद आहे. नानगाव हे भीमा नदी काठावर वसलेले आहे. या गावाला क्षारयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने समस्येला सामोरे जावे लागत होते. २० वर्षांपूर्वी पाणी योजना करण्यात आली. मात्र, या योजनेचे काम निकृष्ट झाल्याने नागरिकांना आजही क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. या योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ नानासाहेब रणदिवे यांनी उपोषणदेखील केले होते. परंतु, तात्पुरते आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले.ग्रामस्थांना शुद्ध पाणी त्वरित मिळण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी सरपंच विश्वास भोसले यांनी केली. तत्कालीन आमदार रमेश थोरात, तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून, तसेच पुणे महानगरपालिकेने ग्रामस्थांसाठी १० लाख रुपये खर्च करून जलशुद्धीकरण योजना उभारली आहे. त्यानुसार अल्पदरात या योजनेंतर्गत ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.