शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आरटीईनुसार नंबर लागला, तरी अद्याप प्रवेश नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:12 IST

उरुळी कांचन : शिक्षण हक्क कायदानुसार सोडतीद्वारे ज्या विद्यार्थ्यांचे बड्या शाळांमध्ये प्रवेशासाठी नंबर लागले, त्या शाळांना तीन वेळा प्रवेशासाठी ...

उरुळी कांचन : शिक्षण हक्क कायदानुसार सोडतीद्वारे ज्या विद्यार्थ्यांचे बड्या शाळांमध्ये प्रवेशासाठी नंबर लागले, त्या शाळांना तीन वेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनसुद्धा त्या शाळांनी अद्याप मुलांना प्रवेश दिला नाही, तर दुसरीकडे शाळेतील इतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण नियमत सुरू झाले आहेत, त्यामुळे आरटीईनुसार नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. शिवाय, मुलांना शाळा प्रवेश देणार की नाही? याची टांगती तलवार पालकांच्या डोक्यावर आहेच.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवेशानंतरही ऑनलाइन वर्ग सुरू झाले नाही. प्रतीक्षा यादीतील मुलांसाठीची प्रवेशाची प्रक्रिया ऑगस्ट उलटून चालला, तरी झालेली नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जात आहे. ज्या शाळांनी विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश दिला नाही, त्यांच्या विरोधात शिक्षण विभाग कठोर भूमिका घेत नसल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवरील केंद्रीय प्रवेशप्रक्रिया अंतर्गत पहिल्या निवड यादीत नावे जाहीर झाल्यानंतर, पालकांनी आवश्यक ती पूर्तता करून प्रवेश निश्चित केला. मात्र, त्यानंतर दीड महिन्याचा कालावधी लोटला, तरी संबंधित शाळांनी या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू न केल्याने पालकांची चिंता वाढली आहे. जे विद्यार्थी प्रतीक्षायादीत आहेत त्याबाबतही पुढील कोणतेच धोरण स्पष्ट न झाल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यांना आपला प्रवेश होईल का? का वेगळ्या पद्धतीने प्रवेश घ्यावा लागेल या कल्पनेने त्यांच्या काळजीत वाढ झाली आहे, ग्रामीण भागात विशेषत: हा प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे, शिक्षण खात्याचे अधिकारी दररोज वेगवेगळे फतवे काढून पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत.

--

कोट -१

त्या शाळांची तक्रार द्या

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळायलाच हवा, प्रवेश घेऊनही शाळा विद्यार्थ्याचा ऑनलाईन शिक्षणाचा हक्क डावलत असतील, त्या शाळांच्या विरोधात पालकांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.

दिनकर टेमकर,

प्राथमिक शिक्षण सहसंचालक

---

८२ हजार नावे अन् ६० हजार प्रवेश

आरटीई प्रवेशाचा राज्याचा तपशील पुढीलप्रमाणे: राज्यामध्ये सुमारे नऊ हजार ४३२ शाळांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला असून, पुण्यामध्ये या शाळांची संख्या ९८५ अशी आहे. राज्यामध्ये एकूण प्रवेशाच्या जागा ९६ हजार ६८४ आहेत पुण्यामध्ये त्यापैकी १४ हजार ७७३ आहेत. पहिल्या यादीत राज्यांमध्ये ८२हजार ११९ मुलांना प्रवेशासाठी निवडण्यात आले होते. आजअखेर राज्यामध्ये ६० हजार ७८७ मुलांनी प्रवेश घेतला आहे,तर पुण्यामध्ये १० हजार ४०५ मुलांनी प्रवेश घेतला अशी परिस्थिती असताना शिक्षण विभाग वेळकाढू धोरण अवलंबून मुलांवर अन्याय करीत आहे. याकडे शिक्षण मंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन सुस्पष्ट शब्दांत आदेश द्यावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.

--